Wikipedia

Search results

Friday 8 March 2013

अजय अतुल

अजय- अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात विविध हिंदी, मराठी, तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. "विश्वविनायक" या संगीत संचीकेद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केले. अजय अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात.अतुल अशोक गोगावले व अजय अशोक गोगावले या जोडगोळीने सावरखेड एक गाव|, अगं बाई अरेच्या !, जत्रा, जबरदस्त, चेकमेट,साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा आणि नटरंग सारखे मराठी चित्रपट तर विरुद्ध ,गायब सारखे हिंदी व शॉक सारख्या तेलुगू चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. राजीव पाटील दिग्दर्शित जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी २००९ च्या उत्कृष्ठ संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांचे नाव शिक्कामोर्तब केले गेले.

बालपण
  अतुल अशोक गोगावले (११ सप्टेंबर, १९७४) आणि अजय अशोक गोगावले (२१ ऑगस्ट, १९७६) यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतुल दोघांपैकी थोरला. वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे.त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले.लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती.दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्रे काढली होती.[४] सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व कलाकार दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल, श्रीफळ वा हार देऊन कौतुक केले गेले होते, त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिंपडून जतवुन ठेवले होते. एन सी सी च्या एका कार्यक्रमात शिकवलेली धुन न वाजवता त्यांनी मनाला वाटलेली धुन वाजवून पुरस्कार पटकावला होता.सांगीतिक जडण घडणीची ही सुरूवात होती.[४] संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण संगीत वाद्ये विकत घेणे त्यांना शक्य नव्हते.म्हणून ते ज्या मित्रांकडे वाद्ये असत त्यांच्याशी मैत्री करत. मंदिरात,शाळेत व बँड पथकां सोबत फिरून सांगीतिक भूक भागाविली जाई.[५] कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी की बोर्ड आणून दिला जी त्यांची सर्वात आवडती भेट ठरली व संगीताचे प्रयोग सुरू झाले.शिक्षणा नंतर त्यांनी मुंबई गाठली व टाइम्स म्यूज़िक च्या विश्वविनायक या गणपतीच्या संचीकेने त्यांचा संगीत क्षेत्रात श्री गणेशा झाला.

संगीत शिक्षण
   अजय अतुल यांनी शास्त्र-शुद्ध पणे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही.[४] पण काळानुरूप व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले.व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. ईलाई राजा यांना ते आपले गुरुस्थानी मानतात.[४] जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते संगीत.जे काळजाला भिडतं आणि आत्म्याला अंतर्मुख करतं, तेच खरं संगीत.अशी त्यांची संगीताबद्दल भावना आहे.

संगीत कारकीर्द
   शिक्षणानंतर त्यांनी मुंबईत येऊन टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या संगीत संचिकेसाठी काम सुरू केले.ज्यात एस. पी. बालसुब्रमणीयम, शंकर महादेवन सारख्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश होता. या संचीकेत आदिदैवत श्री गणेशावर संस्कृत गीते गायली आहेत. त्या काळी चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आधारित भक्तिगीतांची लाट सुरू असल्याकारणाने यात नवीनपणा जपण्याचा प्रयत्न त्यांनी या संचीकेद्वारे केला.[४] ही संचिका प्रसिद्ध व्हायला काही काळ गेला. व त्यानंतर त्यावर प्रतीक्रिया सुरू झाल्या. यानंतर तोंडी प्रसिद्धीने या संचीकेस उत्तम प्रतिसाद मिळाला.[४] यातले श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गीत प्रचलित झाले. यानंतर त्यांनी राम गोपाळ वर्मा यांच्या गायब व महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध या चित्रपटास संगीत दिग्दर्शन केले. या सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट व रंगभूमी वरील नाटकांकडे कल घेतला.या वेळी त्यांनी केदार शिंदेच्या सही रे सही हे नाटक संगीतबद्ध केले. व यासाठी त्यांनी अल्फा गौरव(नंतर झी गौरव) चा पुरस्कार पटकावला. याच काळात त्यांची वर्ल्ड म्यूज़िक द्वारे मीराच्या पारसी भजनांची मीरा कहे नावाने व तरुणाईला उद्देशून सागरिका म्यूज़िक द्वारे बेधुंद या दोन संचिका बाजारात आल्या. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा! चित्रपटाच्या संगीतानंतर त्यांनी रसिकांच्या मनात घर करायला सुरूवात केली. या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेल्या मन उधाण वार्‍याचे , अजय गोगावले व शाहीर साबळे यांच्या आवाजातले मल्हारवारी , व वैशाली सामंत च्या आवाजातले चम चम सारखी गीते रसिकांच्या पसंतीस उतरली.यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून गाऊन घ्यावयाची होती पण काही कारणास्तव योग जुळाला नाही व ते गीत अजय गोगावले च्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले.[४] त्यांनी याच काळात श्रियुत गंगाधर टिपरे व बेधुंद मनाच्या लहरी सारख्या झी मराठी व ई टीव्ही मराठीच्या चर्चित मालिकांसाठी पार्श्वसंगीत दिले.
   राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात कुणाल गांजावाला यांनी वार्‍यावरती गंध पसरला हे गाणे गायले जे रसिकांना भावले. तर याच चित्रपटातील आई भवानी हे अजय गोगावले ने गायलेले गोंधळ खुप गाजले. केदार शिंदे यांच्या जत्रा या विनोदी चित्रपटातील अजय गोगावले च्या आवाजातले ये गो ये मैना व वैशाली सामंत व आनंद शिंदे यांचे कोंबडी पळाली ही गाणी तुफान गाजली.
  नंतर त्यांनी संग संग हो तुम, कॉलेज कॉलेज व तेलुगू भक्तिगीतांचा विश्वात्मा अश्या संचिका बाजारात आणल्या. बेधुंद संचिकेतले स्वप्निल बांदोडकर याने गायलेले गालावर खळी (जे परत मराठीत बनवले गेले) हे गाणे तरुण पिढीला खूपच पसंत पडले. याच काळात त्यांनी दाक्षिणात्य संगीत क्षेत्रात उडी घेतली व राम गोपाळ वर्मा यांच्या शॉक या चित्रपटास संगीतबद्ध केले.ज्यात चक्रि,चित्रा, श्वेता पंडित, एस. पी. बालसुब्रमणीयम, कौशल्या सारख्या नामवंत पार्श्वगायकांचा समावेश होता.ज्यांची गाणीही विक्रमी खपाने प्रसिद्ध झाली.[६] नंतर त्यांनी महेश कोठारे यांच्या जबरदस्त या चित्रपटास संगीत दिले. ज्यात त्यांनी पाश्च्यात संगीतावर भर दिली. ज्यात प्रामुख्याने स्वप्निल बांदोडकर ,अजय गोगावले व रॅपर अर्ल डीसुझा यांच्या गाण्यांचा समावेश होता. याच चित्रपटातले आयचा घो हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. त्याच वर्षी त्यांनी बंध प्रेमाचे नावाच्या चित्रपटाला संगीतबद्ध केले ज्यात शंकर महादेवन, सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रीती कामत सारख्या गायकांचा समावेश होता. तर २००७ चे विशेष आकर्षण ठरलेला झी टॉकीजच्या साडे माडे तीन या चित्रपटाच्या शीर्षक गीतास त्यांनी संगीत दिले.
  २००८ मध्ये संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात त्यांनी संगीत शैलीमध्ये विविधता राखली. प्रसिद्ध छायाचित्रकार,दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चेकमेट या चित्रपटाचे शीर्षक गीत त्यांनी वेस्टर्न व रॅप पद्धतीने रॅपर अर्ल डिसूझा कडून गाऊन घेतले. तर याउलट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सारख्या चित्रपटात नवरी आली सारखी टाळ्यांच्या आधारावरली व काळी धरती, चांगभलं सारखी पारंपरिक गीते देखील त्यांनी साकारली. त्याच वर्षी त्यांनी मुंबई आमचीच सारख्या वादग्रस्त चित्रपटास देखील संगीतबद्ध केले. अजय सरपोतदार निर्मित उलाढाल या चित्रपटात त्यांनी मोरया मोरया सारख्या श्री गणेशाच्या आरतीचे धविमुद्रण प्रसिद्ध ढोल पथक शिवगर्जनाच्या गजरात केले.हे गीत आजही सर्व ठिकाणी गणपतीच्या नावाने जल्लोषात वाजवले जाते. तर त्याच चित्रपटातील दे ना पैसा देना,सब धोखा हैं सारखी पाश्चिमात्य संगीतावर आधारलेली हिंदी गीते गायक कुणाल गांजावाला कडून गाऊन घेतली.
   २००९ हे वर्ष त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरले. सतीश राजवाडे यांचा एक डाव धोबीपछाड, ज्ञानेश भालेकर यांचा बेधुंद व राजीव पाटील यांचा ऑक्सिजन व जोगवा हे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. बेधुंद मधले चायला तिच्या मायला हे कुणाल गांजावाला व अजय च्या आवाजातले गाणे प्रसिद्ध झाले. राजीव पाटील यांचा जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या कारकिर्दीतला सर्वात विशेष चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याच चित्रपटातील जीव दंगला या गाण्यासाठी , मराठी संगीतात पदार्पण करणारे हरिहरन यांना उत्कृष्ठ पार्श्वगायक व श्रेया घोषाल यांना उत्कृष्ठ पार्श्वगायिका म्हणून सन्मानित करण्यात आले. जीव दंगला खेरीज या चित्रपटात अजय गोगावले यांच्या आवाजात लल्लाटी भंडार हे गोंधळ गीत, आनंद शिंदे यांच्या आवाजात हरीणीच्या दारात व श्रेया घोषाल यांच्या आवाजात मन रानात गेलं ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली.याच चित्रपटासाठी त्यांना संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   २०१० च्या सुरुवातीस त्यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट नटरंग प्रदर्शित झाला. ज्याच्या पारंपरिक तमाशा,लावणी, गवळण, कटाव या प्रकारात मोडणार्‍या संगीतास समीक्षक, रसिक सगळ्यांकडून विशेष कौतुकाची दाद मिळाली. यात त्यांच्या,बेला शेंडे व अजय च्या आवाजातल्या वाजले की बारा, अप्सरा आली ह्या लावण्या विशेष लोकप्रिय ठरल्या. तसेच कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी व खेळ मांडला या गीतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव,महाराष्ट्र टाईम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण, राज्य शासन चित्रपट ई. पुरस्कार सन्मानित करण्यात आले.त्यानंतर छायाचित्रकार, दिग्दर्शक संजय जाधव यांच्या रिंगा रिंगा या चित्रपटास त्यांनी संगीत दिले ज्यात सुखविंदर सिंग यांनी घे सावरून हे गाणे, तर बायगो बायगो हे पाश्चात्य संगीतशैलीवर बेतलेले गाणे कुणाल गांजावाला यांनी गायले.
  

No comments:

Post a Comment