Wikipedia

Search results

Sunday 8 February 2015

हिब्रू भाषा


इब्रानी (हिब्रूעִבְרִית‎, Ivritसामी-हामी भाषा-परिवार की सामी शाखा में आने वाली एक भाषा है। ये इस्राइल की मुख्य- और राष्ट्रभाषा है। इसका पुरातन रूप बिब्लिकल इब्रानी यहूदी धर्मकी धर्मभाषा है और बाइबिल का पुराना नियम इसी में लिखा गया था। ये इब्रानी लिपि में लिखी जाती है ये दायें से बायें पढ़ी और लिखी जाती है। पश्चिम के विश्वविद्यालयों में आजकल इब्रानी का अध्ययन अपेक्षाकृत लोकप्रिय है।
प्रथम महायुद्ध के बाद फिलिस्तीन (यहूदियों का इज़रायल नामक नया राज्य) की राजभाषा आधुनिक इब्रानी है। सन् १९२५ई. में जेरूसलम का इब्रानी विश्वविद्यालय स्थापित हुआ जिसके सभी विभागों में इब्रानी ही शिक्षा का माध्यम है। इज़रायल राज्य में कई दैनिक पत्र भी इब्रानी में निकलते हैं।

परिचय[संपादित करें]

इब्रानी भाषा सामी परिवार ((सेमेटिक फेमिली) की भाषाओं में से एक है। यह यहूददियों की प्राचीन सांस्कृतिक भाषा है। इसी में उनका धर्मग्रंथ (बाइबिल का पूर्वार्ध) लिखा हुआ है; अत: इब्रानी का ज्ञान मुख्यतया बाइबिल पर निर्भर है।
व्युत्पत्ति की दृष्टि से 'सामी' शब्द नौह के पुत्र सेम से संबंध रखता है। सामी भाषाओं की पूर्वी उपशाखा का क्षेत्र मेसोपोटेमिया था। वहाँ पहले सुमेरियन भाषा बोली जाती थी; फलस्वरूप सुमेर की भाषा ने पूर्वी सामी भाषाओं को बहुत कुछ प्रभावित किया है। प्राचीनतम सामी भाषा अक्कादीय की दो उपशाखाएँ हैं, अर्थात् असूरी और बाबुली। सामी परिवार की दक्षिणी उपशाखा में अरबीहब्शी (इथोपियाई) तथा साबा की भाषाएँ प्रधान हैं। सामी वर्ग की पश्चिमी उपशाखा की मुख्य भाषाएँ इस प्रकार हैं: उगारितीय, कनानीय, आरमीय और इब्रानी। इनमें से उगारितीय भाषा (१५०० ई. पू.) सबसे प्राचीन है; इसका तथा कनानीय भाषा का गहरा संबंध है।
जब यहूदी लोग पहले पहल कनान देश में आकर बसने लगे तब वे कनानीय से मिलती जुलती एक आरमीय उपभाषा बोलते थे; उससे उनकी अपनी इब्रानी भाषा का विकास हुआ है। ऐसा प्रतीत होता है कि 'इब्रानी' शब्द हपिरू से निकला है; हपिरू (शब्दार्थ 'विदेशी') उत्तरी अरबी मरुभूमि की एक यायावर जाति थी, जिसके साथ यहूदियों का संबंध माना जाता था। बाबीलोन के निर्वासन के बाद (५३९ ई. पू.) यहूदी लोग दैनिक जीवन में इब्रानी छोड़कर आरमीय भाषा बोलने लगे। इस भाषा की कई बोलियाँ प्रचलित थीं। ईसा भी आरमीय भाषा बोलते थे, किंतु इस मूल भाषा के बहुत कम शब्द सुरक्षित रह सके।
अन्य सामी भाषाओं की तरह इब्रानी की निम्नलिखित विशेषताएँ हैं। धातुएँ प्राय: त्रिव्यंजनात्मक होती हैं। धातुओं में स्वर होते ही नहीं और साधारण शब्दों के स्वर भी प्राय: नहीं लिखे जाते। प्रत्यय और उपसर्ग द्वारा पुरुष तथा वचन का बोध कराया जाता है। क्रियाओं के रूपांतर अपेक्षाकृत कम हैं। साधारण अर्थ में काल नहीं होते, केवल वाच्य होते हैं। वाक्यविन्यास अत्यंत सरल है, वाक्यांश प्राय: 'और' शब्द से सहारे जोड़े जाते हैं। इब्रानी में अर्थ के सूक्ष्म भेद व्यक्त करना दु:साध्य है। वास्तव में इब्रानी भाषा दार्शनिक विवेचना की अपेक्षा कथासाहित्य तथा काव्य के लिए कहीं अधिक उपर्युक्त है।
प्रथम शताब्दी ई. में यहूदी शास्त्रियों ने इब्रानी भाषा को लिपिबद्ध करने की एक नई प्रणाली चलाई जिसके द्वारा बोलचाल में शताब्दियों से अप्रयुक्त इब्रानी भाषा का स्वरूप तथा उसका उच्चारण भी निश्चित किया गया। आठवीं-दसवीं सदी में उन्होंने समस्त इब्रानी बाइबिल का इसी प्रणाली के अनुसार संपादन किया है। यह मसोरा का परंपरागत पाठ बतलाया जाता है और पिछली दस शताब्दियों से इब्रानी बाइबिल का यह सबसे प्रचलित पाठ है। इसका सर्वाधिक प्रसिद्ध संस्करण बेन ह्यीम का है जो १५२४ ई. में वेनिस में प्रकाशित हुआ था। सन् १९४७ ई. में फिलिस्तीन के कुमराम नामक स्थान पर इब्रानी बाइबिल तथा अन्य साहित्य की अत्यंत प्राचीन हस्तलिपियाँ मिल गईं। इनका लिपिकाल प्राय: दूसरी शताब्दी ई.पू. माना जाता है। विद्वानों को यह देखकर आश्चर्य हुआ कि बाइबिल की ये प्राचीन पोथियाँ मसोरा के पाठ से अधिक भिन्न नहीं हैं।
मध्यकाल में एक विशेष इब्रानी बोली की उत्पत्ति हुई थी जिसे जर्मनी के वे यहूदी बोलते थे जो पोलैंड और रूस में जाकर बस गए थे। इस बोली को 'यहूदी जर्मन' अथवा 'यिद्दिश' कहकर पुकारा जाता है। वास्तव में यह एक जर्मन बोली है जो इब्रानी लिपि में लिखी जाती है ओर जिसमें बहुत से आरमीय, पोलिश तथा रूसी शब्द भी सम्मिलित हैं। इसका व्याकरण अस्थिर है, किंतु इसका साहित्य समृद्ध है।

Friday 8 August 2014

भूकंप

भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होवून पृथ्वी च्या पृष्ठभागाची हालचाल होण्यात होते. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.
चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भुकंपाची नोंद घेणार्‍या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.
  भुकंपाची तिव्रता मोजण्याच्या यंत्रास "सिस्मोग्राफ" अथवा "सिस्मोमिटर" असे नाव आहे तसेच भुकंप मोजण्यासाठी "रिष्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. ३ रिष्टर स्केल वा त्या पेक्षा कमी तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात. तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.
समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भुकंप प्रलयांकारी त्सुनामी निर्माण करू शकतो.
भुकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याशी कारणाने भूगर्भातील हालचाल व भुकंप होवू शकतो.
    * ज्वालामुखी जागृत झाल्याने.
    * खाणींमध्ये केलेले कृत्रिम स्फोट.
    * अणूचाचण्या.
भुकंपमापक रिष्टर परीमाण
 भुमध्याजवळील(एपिसेंटर)वेगवेगळ्या तिव्रतेच्या होणार्‍या भुकंपाचे परीणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपुर्वक अभ्यास करावयास हवा कारण, भुकंपाची तिव्रता व तदानुषंगाने होणारे त्याचे परीणाम फक्त त्याच्या तिव्रतेवरच अवलंबुन नसुन त्याचे भुमध्यापासुनचे अंतर,भुमध्याखालील त्याच्या केंद्राचे(फोकस) अंतर,व भौगोलीक परीस्थिती यावरही अवलंबुन असते.(काही प्रदेश भुकंपाच्या संकेतांची(सिग्नलस्) तिव्रता वाढवतात.
जलाशयामुळे भूकंप
१७  व १८ डिसेंबर २००९च्या दोन लेखांमध्ये ‘लोकसत्ता’ने खरे तर दोन वेगळे विषय मांडले होते. प्रतिक्रिया देताना भूगर्भतज्ज्ञ रत्नाकर पटवर्धन यांनी (१८ जानेवारी २०१०) दोन्ही लेखांमधील हा अंत:प्रवाह ओळखलेला दिसत नाही. भूकंप हे अटळ वास्तव आहे. जेथे धरण बांधले आहे, तेथे भूकंप होतात. तसेच जेथे धरणच नाही तेथेही भूकंप होतात. समुद्राच्या तळाशीही भूकंप होतात. उत्तुंग पर्वताच्या खालीही भूकंप होतात. १७ डिसेंबरच्या लेखात कोयना-वारणा क्षेत्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात सरकल्याची माहिती दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या परिसरातील भूकंपाच्या नोंदींचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते. या क्षेत्रातील सध्याचे ९० टक्केपेक्षा जास्त भूकंपांचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आढळून येतात. तर १८ डिसेंबर २००९च्या संपादकीय लेखात सर्वसामान्य जनतेचा भूकंपाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा; भूकंपपीडित जनतेने मदत याचना करताना शासनाकडूनच सर्व अपेक्षा करण्याची मनस्थिती कशी बदलावी; भूकंपाची वास्तविकता स्वीकारून त्याला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्याकडे मनोबल कसे वळवावे याबाबतचे मत अत्यंत डोळसपणे मांडले आहे.
  समाजाने वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. त्यात शासन-प्रशासनही आलेच. धरणासह सर्व बांधकामे ही भूकंपात टिकतील अशी बांधायला हवीत. भूकंपापूर्वी, भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही वाद असण्याचे कारण नाही.
आता थोडे ‘जलाशयामुळे होणारे भूकंप’ फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ या पटवर्धन यांच्या लेखनातील वादग्रस्त मुद्याविषयी. वास्तविक त्यांनी केलेला शब्दप्रयोगदेखील आता कालबाहय़ झालेला आहे. हे खरे आहे, की हूवर धरण बांधल्यानंतर १९४०च्या दशकापासून काही मोजके भूगर्भतज्ज्ञ हे ‘धरणामुळे भूकंप होतात’ या दृष्टिकोनाचे प्रवर्तक होते. परंतु हळूहळू            यांचा उत्साह मावळला. जगामध्ये सुमारे ४० हजार धरणांपैकी डझनभर धरणेदेखील यांच्या मताला दुजोरा देणारी ठरली नाहीत. तेव्हा त्यांनी फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (            या संकल्पनेचा त्याग करून फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (फकर) जलाशय उद्युक्त भूकंप असा शब्दप्रयोग सुरू केला.
   पटवर्धन यांनी हे कोयना, भातसा, किल्लारी याबरोबरच चणकापूर येथील धरणाचाही उल्लेख करून या सर्व ठिकाणी धरणे बांधून त्यात पाणी साठविल्यानंतर भूकंप झाल्याचे लिहितात. तसेच हे भूकंप ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर असे पावसानंतर आणि धरणे भरलेली असताना होतात, याकडे लक्ष वेधले आहे. बहुधा त्यांनी हे विधान ऐकीव गोष्टीच्या आधारे केले असावे असे वाटते. उत्कृष्टपणे गोळा व जतन होत असलेल्या कोयनेच्या भूकंपाच्या नोंदी पाहिल्या असता असे दिसून येते, की मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतही तेवढेच किंवा काही वेळा इतर महिन्यांपेक्षा जास्त भूकंप झाले आहेत. ते म्हणतात तसे जलाशय भरणे व रिकामे होण्याच्या प्रक्रियेशी किंवा काही जण म्हणतात त्याप्रमाणे ज्या गतीने जलाशय भरतो किंवा रिकामा होतो त्या गतीशी भूकंपाचा काहीही संबंध नाही, हे भूकंपप्रवण क्षेत्रातील कोणत्याही धरणाच्या आकडेवारीवरून सिद्ध करता येऊ शकते व तसे यापूर्वी केलेही आहे.
  पटवर्धन यांनी, महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा खडक, त्याची रचना आणि गुणधर्म लक्षात घेता धरणामुळे, त्यातील पाणीसाठय़ामुळेच भूकंप होतात, असे वाटू लागते तसेच ५० वर्षांत झालेले भूकंप नवीन निर्माण केलेल्या धरणांमुळेच घडले असल्याचे धाडसी विधान केले आहे. वास्तविक महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकाच्याच रचना व गुणधर्मामुळे धरणाचा किंवा पाणीसाठय़ाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असे ठामपणे म्हणता येईल! विशेषत: भूकंप जमिनीखाली ज्या खोलीवर निर्माण होतात, तेथपर्यंत या धरणाचा किंवा जलाशयाच्या पाण्याचा यत्किंचितही परिणाम पोहोचू शकणार नाही, असे दिसून आले आहे. जलाशय उद्युक्त भूकंप या तत्त्वाचे प्रणेते ज्या वैज्ञानिक तत्त्वाचा आधार घेण्याचे प्रयत्न करतात त्याबद्दलची
वस्तुस्थिती खालीलप्रमाणे-
दिसली ना पाण्याचा झिरपा१. धरणामुळे होणाऱ्या पृथ्वीवरील वजनवाढीमुळे खडकातील स्ट्रेन एनर्जी बाहेर पडून भूकंपनिर्मिती होते, असे सांगितले जाते. वास्तविक कोणत्याही धरणामुळे पडणारा जमिनीवरील दाब हा ३-४ मजली इमारतीच्या पायाच्या दाबापेक्षा कित्येक पटीने कमी असतो हे सिद्ध करता येऊ शकेल.
२. जलाशयातील पाण्याचा खोलवर झिरपा होऊन खडकामधील घर्षण कमी झाल्याने भूकंप होतात असेही म्हटले जाते. भूकंपाची निर्मिती जमिनीखाली काही किलोमीटर खोलवर होते. तेथपर्यंत पाण्याचा झिरपा पोहोचणे केवळ अशक्य आहे. कोयना जलाशयाच्या खाली बोगद्यांचे जाळे खणण्यात आले आहे. ते जलाशयाखाली ५० मीटरपेक्षा कमी खोलीवर आहे. त्या ठिकाणी काम सुरू असताना तेथील खडकांमध्ये ना स्ट्रेसलेव्हलमध्ये वाढ  आढळला
  हैदराबाद येथील एका संस्थेच्या वैज्ञानिकांनी असेच सिद्धान्त मांडून पाण्याची पातळी जेव्हा जेव्हा उच्चांक गाठेल त्या त्या वेळेस पूर्वी मोठे भूकंप झाल्याचे लिहून कोयना परिसरात डिसेंबर २००५ पूर्वी असा मोठा भूकंप होणार असल्याचे भाकित सप्टेंबर २००५ मध्ये वर्तविले होते. तसेच १५ दिवसांच्या अंतराने दोन मध्यम स्वरूपाचे भूकंप (चार रिश्टर स्केल) झाल्यास पुढील तीन महिन्यांत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होतो आणि त्यामुळेच डिसेंबर २००५ पर्यंत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होईल, अशी बातमी माध्यमापर्यंत सप्टेंबर महिन्यात पोहोचल्याने घबराटीचे वातावरण होते; तेव्हा जलसंपदा विभागाने व कोयना प्रकल्पाने या वृत्ताचे खंडन करून अभिलेखावरील भूकंप नोंदी, जलाशयाच्या पाण्याची पातळी, जलाशय भरण्याचा व रिक्त होण्याचा दर या कोणत्याच निकषावर हे सिद्धान्त खरे ठरत नसल्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर २००५मध्ये दाखविले होते. संबंधित शास्त्रज्ञांना हैदराबाद येथे भेटून  कोयना येथे बोलावून त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली होती.

Thursday 31 July 2014

व्यवसाय


सुतारकाम 


सुतार करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यां च्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे. चांभार


बारा बलुतेदारांपैकी चांभार हे एक. पूर्वीपासून प्रत्येक गावामध्ये असे बलुतेदार असत. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
कातडीं कमावण्याचा धंदा न करितां कमावलेल्या कातड्याचे जोडे व इतर जिन्नस करणारे लोक स्वत:स मोची हें नांव घेतात; व आपला दर्जा जरा उच्च समजतात.
पूर्वी चर्मकार (चांभार) समाजातील बांधव कातडी कमावण्याचा धंदा करत असत. नुकतेच काढलेले व नदी अथवा तत्सम पाणवठ्यावरून भिजवून वाळत घातलेले कातडे मोठे निब्बर असायचे. त्याला मनासारखा आकार द्यायचा (पादत्राणे बनवण्यासाठी) तर ते पहिल्यांदा नरम पडायला हवे. त्यासाठी या चांभाराकडे इंगा नावाचे औजार होते. त्याने या कातड्याला चांगले बडवून काढले की ते नरम पडे आणि मग ते चांभाराच्या मनासारखे निमुटपणे आकार घेई. 



कुंभार

ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.
अन्य अवजारे
आवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो.
गंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.
चोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.
बांबूचा दांडा : हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आ‍ऱ्यांमध्ये बांबू घुसवून कुंभार चाकाला गती देतो.

लोहार

लोहार म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. लोखंडाला ऐरणीवर ठोकूनठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची/ बागकामाची अवजारे, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.
भट्टीमध्ये  लोखंडाच्या अगर पोलादाच्या लहान वस्तू लाल होईपर्यंत तापवून व ठोकून आ. १. बिडाची भट्टी : (अ) पुढील दृश्य : (१) कोळसा ठेवण्याची जागा,  (२) छिद्रयुक्त प्रोथ, (३) धुराडे; (आ) मागील दृश्य : (१) हवेचा झोत नियंत्रित करणारी झडप, (२) झोत निर्माण करणारा पंखा चालविणारे विद्युत् चलित्र. हाताने बनविण्याच्या कामास लोहारकाम म्हणतात. बंद भट्टीत मोठ्या वस्तू तापवून मोठ्या यांत्रिक घणाने ठोकून आकार देण्याच्या कामास घडाईकाम (फोर्जिंग) म्हणतात. [⟶ घडाई, धातूची]. शेतीकरिता लागणारी हत्यारे व अवजारे म्हणजेच विळा, कोयता, कुऱ्हाड, खुरपे, पहार वगैरे वस्तू लोहार बनवितो; तसेच बैलगाडीच्या लाकडी चाकास लोखंडी धाव बसवितो. भट्टीमध्ये घडीव लोखंड तापविल्यास त्यास कोणताही आकार देण्याइतपत ते नरम होते अगर त्याला लवचिकपणा येतो हा गुणधर्म माहीत झाल्यामुळे लढाईकरिता लागणारी तलवार, भाला, खंजीर, कट्यार, बाणाची टोके, परशू वगैरे हत्यारे लोहार बनवीत असत. ॲल्यूमिनियम मिश्रधातू, पितळ, कासे (ब्राँझ) याही लोहेतर धातूंपासून यंत्रांचे सुटे भाग व अनेक वस्तू लोहार बनवितो.

शिंपी  

शिंपी  म्हणजे कपडे शिवणारा. तसेच शिंपी हे आडनावही असते.आपल्या आवडीचे, अंगाला नीट बसणारे, सरळ दुकानात जाऊन खरेदी करावयाचे पँट, शर्ट, कोट यांसारखे कपडे. कापडाच्या दुकानात कापड खरेदी करून त्यातून शिंप्याने आपली मापे घेऊन त्यांनुसार शिवलेल्या कपड्यांपासून भिन्नत्व दर्शविण्यासाठी ही संज्ञा वापरात आहे.
भारतात शिलाई मशीनचा प्रवेश झाला तोच १९व्या शतकाच्या अखेरीस. आधी नवीन तंत्राला विरोध झाला असला तरी एक-दोन दशकांत भारतीय शिंपी मशीनला सरावले. त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांनाही आत्मसात करत गेले. इंग्रज काळात भारतीय सैन्याच्या वेशभूषेत बदल होऊ लागलेला होताच. पण या बदलांचाही फारसा आर्थिक लाभ शिंपी समाजाला होवू शकला नाही. पन्नासच्या दशकात रेडीमेड कपड्यांनी तर खेडोपाडी पसरलेल्या शिंप्यांवर वाताहत होण्याची पाळी आणली. जे शिकले ते अन्य व्यवसायांत शिरले. सरकारी वा कारखान्यांत नोक-या करु लागले. जे नाही शिकले ते परंपरागत व्यवसाय कसाबसा करत राहिले.







सोनार  

सोनार  म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार सहसा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणाऱ्या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात.
देवीदेवतांची आभूषणे नि सौंदर्यालंकार घडविणारे. एवढेच नव्हे तर पंचांग बधून विवाह जुळविणारे. लग्न लावणारे. वधुला सालंकृत करून सजविणारे. नवजात अर्भकांचे कान टोचणारे. दागिन्यांवरील नक्षीकाम, बारीक कलाकुसर याचबरोबरच `एक नंबरी’ सोन्याची हमी देणारे.

गवळी 

गवळी  म्हणजे दुभत्या जनावरांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवून विकणारा व्यावसायिक होय.
दुधदुभत्याच्या धंद्यावरून ‘गवळी’ हें नांव पडलेली जात फक्त मुंबई इलाख्यांतच आहे. अहिरांची 
माहिती स्वतंत्र दिलेली आहे. लो. सं. ३८५४२. दक्षिण-हिंदुस्थान, कोंकण व कर्नाटक या प्रांतभर हे लोक आहेत.धनगर, कुरुबा, मराठा कुणबी इत्यादि लोकांचा भरणा या जातींत बराच असून त्यांच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्यें आठ पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोक एकमेकांशीं रोटीबेटीव्यवहार करीत नाहींत. यांखेरीज कानडी 'गोपाल किंवा गोला' हाहि गवळयांचाच एक पोटभाग आहे असें म्हणतात.या लोकांच्या पुष्कळ चालीरीती लिंगायतांप्रमाणें असून कांहीं खास लिंगायत झालेले आहेत. एक आडनांव असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली यांमध्यें रूढ आहेत.हे लोक मांसाहारी असून त्याचा सामाजिक दर्जा कुणब्यांहून वरचा आहे. यांची मुख्य देवता कृष्ण ही होय.यांच्या कुलदेवता महादेव, खंडोबा, विठोबा इत्यादि आहेत.जंगम व ब्राह्मण हे त्यांचे उपाध्ये असतात परंतु लग्नाच्या वेळीं ब्राह्मण असावाच लागतो.

डॉक्टर

डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी साक्षात देवच , आणि हे डॉक्टर आज त्यांच्यासाठी रक्षक नाहीतर भक्षकच झाले आहेत .....आज शिक्षणाचाही " आईचा घो झाला आहे " म्हणजेच पैसे देऊन डोनेशन वर मेडीकललाही सहज प्रवेश घेता येतो अर्थातच ज्यांच्या बापजाद्यांकडे पैसा असतो तेच लोक जातात ( लायकी नसतानाही ) आणि काय तर म्हणे आम्ही डॉक्टर ? तुम्हाला जर मानवी जीवनाच मूल्य कळत नसेल तर तुमचं डॉक्टर असणे हे ओसामा बिन लादेन असण्या सारखच आहे नव्हे का ? कारण त्यालाही मानवी जीवनाच मूल्य हे माहित नव्हत ते काय असतं हे आणि हे सर्व जगाला माहित आहे. तुम्ही तर चक्क सफेद कपडे, नव्हे कफन ओढून हे काम करता आणि म्हणे आमचा संप आहे आमच्या एका डॉक्टर सहकाऱ्याला मारहाण झाली .संप जरूर व्हावा पण तो कोणाच्याही जीवाशी खेळून नाही . तुम्ही डॉक्टर आहात यम नाही. तुमचं काम जीवन देणं आहे घेणं नाही. म्हणून तुम्हाला संपाचा विचार करताना काम बंद आंदोलन करण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधला पाहिजे. कारण उद्या डॉक्टरांवर हमला झाला म्हणून फाशीचा कायदा जरी झाला तरी तुम्हाला असे हमले होणार नाहीत अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीच आहे ......कारण एखाद्या परिवारातील व्यक्ती डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जर दगावली तर तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांना कायद्याच काही देणं घेणं नसेल आणि तुमच्यावर हमला केला जाईल .....म्हणून जर तुम्ही डॉक्टर म्हणून व्रत अंगिकारले असेल तर तुम्हाला तुमच्या रुग्णाकडे एक बकरा म्हणून न पाहता त्याच्याशी तुमचं सौहार्दाच नात निर्माण झालं पाहिजे तुमच्या वर त्याचा संपूर्ण विश्वास असला पाहिजे. तरच हे हल्ले होणार नाहीत नाहीतर तुम्हाला फाशीचा कायदाही वाचू शकणार नाही ...

भारतीय पोलिस सेवा

भारतीय पोलिस सेवा (इंडियन पोलिस सर्व्हिसेस किंवा आय.पी.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.पी.एस. ही तीन आखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.पी.एस. सेवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या पोलिस खात्यांत अनेक महत्त्वाची पदे आय.पी.एस. अधिकारी सांभाळतात.
आय.पी.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. निवड झालेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलिस विद्यालय (नॅशनल पोलिस अकॅडमी) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.

खालील काही प्रमुख पदे आय.पी.एस. अधिकारी भुषवितात:
भारतीय गुप्तहेरखात्याचे (इंटेलिजन्स ब्यूरो) संचालक
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण खात्याचे (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरो) संचालक
सीमा सुरक्षा पोलिस संचालक अधिकारी
रेल्वे सुरक्षा बल संचालक अधिकारी
पोलिस कमिशनर

सैनिक

पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे.
युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनीक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते.


रॉयल आयरिश रॅफल्स राशन पार्टी, १९१६
सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारिरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो.
दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. 

Friday 11 July 2014

बटाट्यापासून वीज!

बटाट्यापासून वीज!

उकडलेल्या बटाट्याचं तुम्ही काय काय करू शकता? वडा, कटलेट, शेव.. अर्थात, हे सर्व झाले खाण्याचे पदार्थ आणि बटाटयाचा खाण्याव्यतिरिक्त काय उपयोग असू शकतो, असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र उकडलेल्या बटाट्यापासून चक्क वीजनिर्मिती होऊ शकते हे जरा अनपेक्षितच आहे नाही का..? पण जेरुसलेमच्या काही संशोधकांनी उकडलेला बटाटा खाण्याऐवजी चक्क वीजनिर्मितीसाठी वापरला आहे.

बटाटा हा बहुगुणी कंदमूळ आहे हे सर्वानाच माहीत आहे, पण या बहुगुणी बटाट्यापासून वीज निर्माण होऊ शकते हे मात्र जरा अतीच होतंय असं वाटेल. पण हे खरं आहे व जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीतील कृषिविज्ञानाचे प्राध्यापक हैम राबिनोविच व त्यांच्या सहका-यांनी हे सप्रयोग सिद्ध करून दाखवलं आहे. कच्च्या बटाट्याचा एक छोटा पातळ काप कॉपर कॅथोड व झिंक अ‍ॅनोड यांच्यामध्ये ठेवून त्याची वायर बल्बला जोडल्यास बल्ब पेटतो. अशा प्रकारे निर्माण केलेली ऊर्जा चाळीस दिवसही पुरू शकते, हे त्यांना सिद्ध करायचं होतं. ही ऊर्जा सेलफोन व इतर उपकरणांसाठीही वापरता येऊ शकते. मुख्य म्हणजे यासाठी नेहमीच्या बॅटरीपेक्षा अत्यंत कमी खर्च येतो. बटाटयाचा ऊर्जानिर्मितीसाठीचा हा वापर हा आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या भागातील रहिवाशांसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

कच्चा बटाटा हा दोन धातूंमध्ये फक्त विद्युतवाहकाचं काम करतो, ज्यामुळे विद्युतभारीत कण वायरमध्ये जाऊन विजेला प्रवाही करतात. खरं तर स्ट्रॉबेरी व केळं या फळांमध्येही अशा प्रकारची विद्युतनिर्मितीची क्षमता आहे, त्यांच्यातही नैसर्गिकरित्या बॅटरी अ‍ॅसिड असतं. मात्र ही फळं सर्वच देशांमध्ये उपलब्ध नाहीत आणि असली तरीही ती सर्वच गरिबांना सहजरीत्या परवडतील अशी नाहीत, शिवाय ती नाशवंतही आहेत. मात्र बटाट्याच्या कोणत्याही वातावरणात टिकून राहण्याच्या गुणामुळे व तो सर्वत्र सहज उपलब्ध असल्यामुळे आम्ही बटाट्यालाच या प्रयोगात वापरल्याचं राबिनोविच यांनी सांगितलं. बटाटा हा जगातलं सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन असलेलं चौथं पीक आहे. बटाट्यामध्ये असलेला स्टार्च उकडल्यावर निघून जातो व त्यानंतरच त्यापासून ऊर्जा निर्माण होऊ शकते, म्हणूनच आठ मिनिटं उकडलेल्या बटाट्याचा वापर या प्रयोगासाठी करण्यात आला.

या संशोधकांनी बटाटा बॅटरी किटच बनवला आहे, ज्यात दोन मेटल इलेक्ट्रोड्स व अ‍ॅलिगेटर क्लिप्स आहेत. दोन इलेक्ट्रोड्समध्ये बटाट्याचा काप ठेवण्याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून एक काप सुकला की बल्ब किंवा उपकरण सुरू ठेवण्यासाठी दुसरा काप त्यात लगेच सरकवला जाऊ शकतो. नेहमीच्या बॅटरी किंवा विजेवर उपकरण चालवण्यापेक्षा बटाट्यापासून तयार होणा-या विजेचा खर्च दहापटीने कमी असेल, असा संशोधकांचा दावा आहे. जेरुसलेमच्या संशोधकांच्या या प्रयोगावर काहींनी टीकाही केली आहे. जिथे अन्नच मिळणे मुश्कील तिथली जनता मुळात वीज निर्माण करण्यासाठी बटाटा का वापरेल, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अन्नपदार्थापासून ऊर्जानिर्मिती करायची असल्यास त्याची मुबलकता खूपच पुष्कळ प्रमाणात असली पाहिजे, असा मुद्दा या प्रयोगासंदर्भात पुढे आला आहे. अद्याप राबिनोविच यांच्या या प्रयोगाला प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणी पुरस्कर्ते मिळालेले नाहीत, तेव्हा आपल्या या प्रयोगाला कोणीतरी पाठिंबा देऊन समाजाच्या उपयोगी पडू शकेल असा हा बटाटा बॅटरी किट प्रत्यक्षात आणावा, असं त्यांना वाटत आहे.

Wednesday 2 July 2014

सुरूची बाग

सुरूची बाग

सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्‍यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
इथून मग समुद्रचा आवाजच खेचून घेतो.. सरळ जाणारी वाट नि आजुबाजूला खारफुटी.. असे अंतर पार करताना समोरच सुरूची झाडे डोकावू लागतात.. किनार्‍यापाशी पोहोचलो नि खादाडीसाठी चक्क एकच स्टॉल दिसला.. झोपडीच म्हणा.. एखाद दुसरा टांगा नि दोन तीन घोडे.. बाकी विस्तीर्ण पसरलेला किनारा.. असे दृश्य मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर फार कमीच दिसते... इथे पोहोचलो नि किनार्‍यावरील ही सुरूची झाडं वार्‍यामूळे समुद्राच्या विरुद्ध दिशेने कललेली दिसली.. उजव्या बाजूपेक्षा डावीकडे जास्त प्रमाणात झाडे दिसत होती... मग तिथेच आधी फेरफटका मारण्यासाठी गेलो.. सुरूची बाग हे नाव खरच उठून दिसते..

 

- - -- - - - -
प्रचि २
-- - - -- - -
संध्याकाळी चारची वेळ.. पण वातावरण पावसाळी त्यात उंचपुरी अशी ही सुरूची झाडे.. शिवाय सभोवताली पसरलेली हिरवाई.. इथे फिरायला कोणाला नाही आवडणार... स्मित

प्रचि ३
- - -- - - - -

प्रचि ४
(फोटो by 'ती' .. )
- - - -- - - -
इथून मग समुद्र बघतानाही छान वाटते..
प्रचि ५

(ती तिथं उभी.. )
- - - - - -- - -
मग पावले आपसुकच समुद्राकडे वळवली..

- - - -- - - -
प्रचि ७ : समुद्रकिनारा नि घोडागाडी हे मुंबईतल्या चौपाटीवरचे नेहमीचे दृश्य.. पण इथे एकच होती..
- -- - - - - -
प्रचि ८:

धावत जाऊन कधी एकदा त्या समुद्राच्या लाटांवर झोकून देतोय.. !! (लहानपणी आम्ही भावंडेसुद्धा अशी शर्यत लावायचो.. आता कधी मित्रांसोबत गेलो तर उलटे धावत जाण्याची शर्यत खेळतो..फिदीफिदी)
------------
प्रचि ९: एकीकडे आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन तयार झाले..

प्रचि १०:

Monday 16 June 2014

समाजकल्याण

(सोशल वेलफेअर). समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करुन त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे  समाजकल्याण.

भारतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. कल्याणकारी राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनामार्फत उन्नत समाजाच्या प्रगतीबरोबर समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अपंग, महिला इत्यादींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात. समाजकल्याण ही स्थल - काल सापेक्ष संकल्पना असल्यामुळे, या विषयीची व्याख्या ठरविताना सामाजिक, आर्थिक व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. समाजातील वंचित, दुर्बल व मागासवर्गीय जनतेला पूरक व पोषक सहाय्य करणे,हे कल्याणकारी सेवांचे कार्यक्षेत्र होय. परिस्थितीजन्य व इतर अनिवार्य समस्यांमुळे ज्या विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायांचा सर्वांगीण विकास होत नाही (उदा., वृद्घ, बालके, स्त्रिया, अपंग, दलित, गोरगरीब, आदिवासी इ.) अशा व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी समाजकल्याणाचे उपकम गरजेचे ठरतात.

माजकल्याणाची कल्पना प्राचीन काळापासून प्रचलित आहे. नैतिक व धार्मिक परंपरा व तत्कालीन शासनकर्त्यांची कर्तव्ये, यांच्या सर-मिसळीतून अनेक गंथांत कल्याणसंबंधी तत्त्वे मांडलेली आहेत. समाज-ऋण प्रत्येक सक्षम व्यक्तीने, गृहस्थाने व शासन करणाऱ्यानी फेडले पाहिजे, ही शिकवण प्राचीन धार्मिक व पुराणगंथांत सापडते. सेवा-भावाची उत्पत्ती मानवाच्या ठायी असलेल्या दया, करुणा व संवेदनक्षमता या प्रवृत्तीमुळे प्रकट होते, हे गृहीत धरले आहे. प्राचीन ऋग्वेदा मध्ये ‘दातृत्व’ या गुणाचा गौरव केला आहे ( ऋ. १०·११७). स्मृतिवाङ्मयात व पुराणांत दानशूर राजा हरिश्चंद्र व दधीचीच्या कथा सापडतात. प्रजेच्या हितासाठी समाट अशोकाने केलेल्या सेवायोजनांचे उल्लेख शिलालेखांत कोरलेले आढळतात. उपनिषदांत सर्व मानवजातीला स्वास्थ्य व सुख लाभावे, असे प्रतिपादन केले आहे. जनतेचे कल्याण व हित साधणे, हेच समाजव्यवस्थेचे व शासकीय यंत्रणेचे मुख्य उद्दिष्ट असावे, असा आदर्श प्रचलित होता -

                   सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय: ।
 सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्

                   दु:खभाग् भवेत् ॥ 
कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देखील राजाच्या कर्तव्यांची चर्चा आहे - 
                  प्रजासुखे सुखम् राज्ञ: प्रजानांच हिते हितम् । 
                 नात्मप्रिये हितम् राज्ञ: प्रजानांतु प्रियम् हितम् ॥ 
‘ जनतेच्या सुखसमाधानामुळेच राजाला सुख लाभते व जनतेचे कल्याण तेच राज्यकर्त्याचे कल्याण होय .’

योगक्षेम ’ ही संकल्पनादेखील समाजाच्या सर्वांगीण विकासाचा निर्देश करुन, जनहित साधणे हे शासनाचे परमकर्तव्य असल्याचे स्पष्ट करते.

र्वाचीन काळात महात्मा गांधी यांनी सामाजिक समता व न्याय, ही  मूल्ये सर्वोदयाच्या मोहिमेतून प्रचलित केली ‘‘ सर्व व्यक्तींना व त्यांच्या श्रमांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे ,’’ हा सर्वोदयाचा अर्थ  आहे. व्यक्तीचे कल्याण हेच समष्ठीला उत्कर्षाच्या मार्गाकडे नेते, हा संदेश त्यांच्या तत्त्वज्ञानाचाच गाभा आहे. बौद्घ धर्मात दया, करुणा व अहिंसा या तत्त्वांचे पालन करुन मानवाच्या दु:खांचे निवारण करावे, हा संदेश गौतम बुद्घाने दिला. क्रिश्चन धर्म परंपरेत सेवाभाव व मानवसेवा ही उच्च् नैतिक कर्तव्ये मानली आहेत.

पारंपरिक भारतीय समाजामध्ये वैयक्तिक व सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त कुटुंब, जातपंचायती, गामसभा, दानशूर व्यक्ती व धर्मादाय संस्था प्रयत्न करीत असत. राज्यकर्त्यानी गरीब जनतेला दानधर्म करण्याचा त्याकाळी प्रघात होता; मात्र हे कार्य संघटित अथवा व्यापक पातळीवरुन केले जात नसे.

यूरोपमध्ये विशेषत: गेट बिटनमध्ये याविषयी प्रथम प्रयोग केला गेला. तो १६०१ साली राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दित ‘ इंग्लिश पुअर लॉ ’ हा कायदा लागू केला तेव्हा. समाजातील बेघर, बेरोजगार व गरीब जनते-साठी अन्नछत्र व निवारा उपलब्ध करण्याची जबाबदारी स्थानिक चर्च व    इतर धार्मिक संस्थांवर सोपविली गेली. सतराव्या व अठराव्या शतकांत बेघर व बेकारांसाठी आधारगृहे ( वर्क हाउसेस ) व व्यावसायिक संस्था स्थापन  झाल्या.

भारतात देखील १७९३ साली बॅप्टिस्ट मिशनरींनी कलकत्ता शहरात समाजकल्याणाचे प्रयत्न सुरु केले. धर्म प्रचाराच्या कार्याबरोबर त्यांनी अस्पृश्य जाती, अनाथ बालके, भिकारी व कुष्ठरोगी अशा पीडितांसाठी मदतकार्य देण्याच्या सोयी निर्माण केल्या. विशेषत: दुष्काळपीडितांसाठी कार्य सुरु करुन कनिष्ठ जातींसाठी शिक्षण व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. १८८० साली इंगज सरकारने सॅनिटरी कमिशन स्थापन करुन कलकत्ता शहरात स्वच्छता व आरोग्यासाठी मोहीम सुरु केली.१८९६ च्या प्लेगच्या भयंकर साथीच्या काळात लसीकरण व उपायकार्याची योजना आखली. या सर्व कार्यांमुळे, सामाजिक कल्याणाला शासनातर्फे पुरस्कृत केले गेले. यापूर्वीच्या काळात, बहुतेक राष्ट्रांमध्ये संघटित समाजकल्याणाची कल्पना सर्वमान्य नव्हती. व्यक्तींच्या नशिबात दारिद्य, दु:ख, आजार वा इतर काही समस्या आल्या, तर त्या भोगणे हे व्यक्तीच्या नशिबावर अवलंबून असते, अशी विचारसरणी प्रचलित होती. रोगराई व दारिद्य हे प्रश्न अधिभौतिक कारणांमुळे उद्भवतात, असा पक्का समज होता. शासन अथवा श्रीमंत वर्गांमध्ये लोककल्याणाबाबत उदासीनता, उपेक्षा व अनास्था आढळत असे.

हिल्याबाई होळकर (१७२५-९५) यांनी भूतदया आणि परोपकारबुद्घी यांनी प्रेरित होऊन अनेक कल्याणकारी योजना भारतभर राबविल्या आणि त्यांवर अपार खर्च केला. बाह्मणांबरोबरच त्यांनी गोरगरिबांचा नित्य परामर्श घेतला. सणवारी त्यांना कपडे वाटले, थंडीच्या दिवसांत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याना घोंगडी वाटल्या. उन्हाळ्यात आपल्या राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुद्दाम विहिरी व पाणपोया बांधून पाण्याची व्यवस्था केली. पशुपक्ष्यांनाही दाणे व नर्मदा नदीतील माशांना रामनामाच्या कणकेच्या गोळ्या टाकण्याची व्यवस्था केली. भारतभर मंदिरे, घाट बांधून धार्मिक कृत्यांबरोबरच त्यांनी तेथील बाह्मणांना अन्नदान केले. लोकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या आणि यात्रेकरुंची सोय केली. नवीन रस्ते बांधले.

त्रपती शाहू महाराजांनी केलेले समाजकल्याणविषयक कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या राजसत्तेचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सुधारणां-साठी पुरेपूर उपयोग केला. राज्यात अस्पृश्यांसह बहुजन समाजाला शिकण्यासाठी सकिय मदत केली. कोल्हापूरात निरनिराळ्या जातींसाठी विद्यार्थी वसतिगृहे स्थापन केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा आदेश काढला (१९१७).स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव, सामाजिक विषमता व अन्यायाविरुद्घ संघर्ष केला. अस्पृश्यांना शिक्षणात उत्तेजन, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी, निरनिराळे व्यवसाय करण्यास  प्रोत्साहन, सहभोजनाचे कार्यकम व अस्पृश्यता निर्मूलन परिषदांचे आयोजन, असे सर्वांगीण प्रयत्न केले. दुष्काळपीडित शेतकऱ्यांना कर्जवाटप, यात्रेकरुंसाठी धर्मशाळा तसेच स्त्री सुधारणाविषयक विविध कामे त्यांनी केली.

कोणिसाव्या शतकानंतर मानवतावादाचा प्रसार होऊन सामाजिक समस्यां-वर तोडगा काढण्यासाठी बुद्घिवादी व विवेकनिष्ठ तत्त्वे प्रसृत झाली. कल्याणकारक योजनांबाबत वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण होऊन, त्यांबाबत संशोधन व विचारविनिमय होऊ लागला. समाजातील परिस्थिती अभ्यासून योजनापूर्वक कल्याणाची धोरणे आखणे, ही काळाची गरज ठरली. समाजवाद, लोकशाहीवादी तत्त्वे व मानवी हक्कांविषयी जागृती झाली. समाजकल्याणाची प्रमुख जबाबदारी शासनाने उचलावी, हा आगह सर्व थरां-मार्फत प्रचलित झाला. कायदेशीर नियोजित धोरणे व जनतेच्या सहभागाचा उपयोग, हा समाजकल्याणाच्या कार्यासाठी आवश्यक असणे मान्य झाले.

भारतीय समाजकल्याण मंडळाची स्थापना १९४७ साली झाली. गांधींचे सामाजिक प्रबोधनाविषयीचे कार्य पुढील समाजकल्याणाच्या कार्यासाठी मार्गदर्शक ठरले. १९४७ नंतर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या विचारांना कायदेशीर स्वरुप प्राप्त झाले. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: फाळणीनंतर समाजात प्रचंड अशांतता व अस्थिरता निर्माण झाली. तसेच दारिद्य, स्थलांतरांचे पुनर्वसन व सामाजिक स्थैर्य प्रस्थपित करण्यावर भर दिला गेला. या काळात संपूर्ण जगभर आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रांत उलथापालथी झाल्या. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरणामुळे कृषिक्षेत्रातून कामगारांचे औद्योगिक केंद्रांकडे स्थलांतर, शहरांची वाढ व बदलते कौटुंबिक जीवन, या सर्व कारणांमुळे मानवी जीवनमानाविषयीच्या कल्पनांमध्ये आमूलाग बदल घडून आला. वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रांतील लक्षणीय प्रगतीमुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. उत्पादन वाढले, उद्योगधंदे विस्तारले, आरोग्यविषयक सुविधा व रोगप्रतिबंधक उपाय उपलब्ध झाले; मात्र या प्रगतीचा समाजातील सर्व स्तरांना समान फायदा झाला नाही. वास्तवात, सर्वसामान्य जनतेला, विशेषत: ग्रामीण व कनिष्ठवर्गीयांना यथार्थ साधनसामगी, योग्य वेतन, अन्नपुरवठा, निवारा, शिक्षण व सुरक्षा या सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे समाजातील वंचित व दुर्बल जनतेसाठी शासकीय व ऐच्छिक संघटनांमार्फत पूरक मदत व साधनसामगी उपलब्ध करुन देणे अपरिहार्य झाले.

र्थशास्त्रज्ञ टी. एन. मार्शल यांच्या शब्दांत, ‘ कल्याणकारी राज्याचे प्रमुख वैशिष्टय् म्हणजे प्रत्येक नागरिकाला शासनाच्या मदतीने आपले जीवनमान सुधारणे शक्य होईल व त्यांना आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता प्राप्त होईल. कल्याणकारी योजनांसाठी प्रशासकीय यंत्रणा, आर्थिक नियोजन व उत्तम संघटनांची गरज आहे.’

ल्याणकारक योजना तीन पद्घतीने काम करतात : (१) उपचार करणाऱ्या यंत्रणा, (२) प्रतिबंधक सेवा, (३) आधारभूत सेवा.

(१) उपचारार्थी सेवा : या पीडित व अडचणीत असलेल्या, गस्त व्यक्तींसाठी मदत, पुनर्वसनाचे कार्य करतात - (उदा., पूरगस्त, अपंग, वेठबिगार मजूर, विस्थापित आदिवासी).

(२) प्रतिबंधक सेवा : या आधुनिक काळाची मोठी गरज आहे. समाजात घडणारे बदल, बदलते नातेसंबंध, ताण, असुरक्षितता, हिंसाचार यांमुळे कौटुंबिक जीवन विघटित होते. ताणतणावांचा माणसांच्या परस्परसंबंधांवर विपरित परिणाम होतो. त्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्फत समुपदेशन, सामुदायिक भावना बळकट करण्यासाठी कार्यशाळा, लोकशिक्षण असे उपकम, मनोरंजनाचे उपकम व नैतिक शिक्षण यांसारखे उपाय योजावे लागतात. पर्यावरणविषयक माहिती, आरोग्यविषयक शिक्षण इत्यादींमुळे समाजविघातक प्रवृत्तीला व चुकीच्या समजुतींना आळा बसतो.

(३) आधारभूत सेवा : प्रामुख्याने आरोग्य व शैक्षणिक कार्य करतात. कुटुंबनियोजनाचा प्रचार व प्रसार, मानवी संसाधन विकास, व्यावसायिक व अनौपचारिक शिक्षण, रोजगार उपलब्धी, हे प्रमुख कार्य आधारभूत सेवा करतात.

पचार करणाऱ्या सेवा मर्यादित क्षेत्रात व समुदायांसाठी काम करतात. उदा., बालकामगारांचे पुनर्वसन, दुष्काळगस्तांसाठी रोजगार हमी योजना चालविणे.

प्रतिबंधक अथवा प्रचारार्थी सेवांचे क्षेत्र अधिक व्यापक असते. उदा., कुटुंबनियोजनविषयक प्रचारार्थ मोहीम, ‘ एड्सविषयी ’ जागृती, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्घ प्रचार, दारुबंदीसाठी आंदोलने, अंधश्रद्घा निर्मूलनाच्या चळवळी इत्यादी. या मोहिमांचे कार्य म्हणजे समाजातील गैरसमजूती दूर      करुन, लोकजागृती व लोकशिक्षण देणे. विशिष्ट समस्यांबाबत समाजाला अधिक संवेदनाक्षम बनविणे व घातक प्रवृत्तींना आळा घालणे. उदा., भूणहत्या, हुंडा  इत्यादी.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात केवळ शासनातर्फे वरील सर्व कार्यकम व योजना राबविणे अशक्य आहे. बिगरसरकारी ऐच्छिक संघटना मोठय प्रमाणात विकासाच्या कार्यात सहभागी होतात. केंद्रीय कल्याण आयोग व राज्य सरकारच्या पातळीवर सामाजिक कल्याणासाठी प्रकल्प राबविले जातात. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरुन संयुक्त राष्ट्न संघा-तर्फे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ( आय्. एल्. ओ .), बालकांच्या कल्याणा-साठी युनिसेफ सारख्या संघटनांमार्फत निधी व यंत्रणा उपलब्ध करुन दिल्या जातात. १९५० सालापासून शासनातर्फे दहा पंचवार्षिक योजना,   विकास कार्यासाठी आखल्या गेल्या. या सर्व योजनांनी दारिद्य निर्मूलन, बेकारी व शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वानुसार सामाजिक न्याय, समता व स्वातंत्र्य या तत्त्वांचा पुरस्कार केला आहे. पंधराव्या कलमानुसार सर्वांना शैक्षणिक हक्क  व  सोळाव्या  कलमानुसार  रोजगार  मिळण्याचा  हक्क  स्पष्ट  होतो.

भारतासारख्या विकसनशील देशाला विकासाचे धोरण आखताना शासनामार्फत समाजकल्याणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे. आर्थिक विकासाबरोबर सामाजिक क्षेत्रात प्रगती होण्याकरिता सुविधा देण्याबाबत शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. दहाव्या योजनेत कुटुंबकल्याण व बालकांसाठी प्राथमिक शिक्षण, या बाबींवर भर दिला आहे. (२००७ पर्यत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के झाले पाहिजे हे लक्ष्य आहे. आरोग्य व शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे ). विशेषत: स्त्री-साक्षरता वाढावी व बहुसंख्य श्रमिक स्त्रियांसाठी योग्य रोजगार, आरोग्य सेवा आणि समान वेतन निश्चिती कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

मागासवर्गीय व अल्पसंख्याक समुदायांना शासनामार्फत आरक्षण व इतर सवलती दिल्या जातात. घटनेतील शेहेचाळीसाव्या कलमानुसार शैक्षणिक हक्क व रोजगार मिळण्याच्या सुविधा अनुसूचित जाति-जमातींना मिळतात. यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाति-जमाती आयोग स्थापून विविध योजना व कार्यकमांचे नियोजन व संघटन केले जाते. आदिवासींसाठी दहाव्या योजनेनुसार १९४ विकास योजना स्थापन केल्या गेल्या आहेत. ज्यामार्फत शिक्षण, आरोग्यकेंद्र, रस्ते व पूलबांधणी, आश्रमशाळा इ. सोयींसाठी निधी उपलब्ध  होतो.

सार्वजनिक आरोग्यासाठी शासनामार्फत अनेक प्रकल्पांचे आयोजन केले गेले. १९५१ साली भारतीयांचे आयुर्मान ३७·७ टक्के होते, ते वाढून २००६ साली ६८ टक्के झालेले आहे. याचे प्रमुख कारण रोगप्रतिबंधक योजनांतर्फे मलेरिया, क्षयरोग इत्यादींसाठी विविध उपाययोजना कार्यरत आहेत. २००१ साली भारताची लोकसंख्या १०० कोटींवर गेली. कुटुंब नियोजन कार्यकमाचे हे अपयश आहे. त्यामुळे २००१ साली ‘ जनसंख्या स्थिरता कोश ’ स्थापून कुटुंब नियोजनाचा प्रचार व कार्य अधिक सक्षम करण्याचे  प्रयत्न  सुरु  झाले  आहेत.

ग्रामीण विभागांसाठी सामुदायिक विकास प्रकल्प १९५२ साली स्थापन झाला. पंचायत राज विधेयक १९५८ साली लागू झाले. ग्रामीण विकासांच्या कार्यात बिगर - शासकीय व खाजगी संस्था देखील विधायक काम करताना दिसतात. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्घी खेडयतील विकासकार्य; राजस्थानातील पाणी साठवण व व्यवस्थापन करण्यासाठी राजेंद्रसिंह यांनी राबविलेला ‘ जोहड ’ प्रकल्प हे कार्यकम सुयोग्य नेतृत्व व खेडयतील जनतेच्या सकिय सहभागामुळे यशस्वी  ठरले. आजच्या घटकेला ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्तेबांधणी व अन्नधान्य वितरणाबाबत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे  आहे.

हरी विभागाकडे शासकीय निधी व विकास यंत्रणेचा ओघ वाढत आहे; पण ग्रामीण भागात असंतुलित व अपुरा विकास होतो आहे. दुष्काळाचे सावट, अन्नधान्याची टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, भूकबळी आणि कुपोषणाची गंभीर समस्या, ही परिस्थिती कल्याणकारी योजनांमधील त्रुटी दर्शविते. नोबल पारितोषिक विजेते डॉ.  अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थक्षेत्राचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे कल्याणाच्या संधी व क्षमता निर्माण होतात. या क्षमता आरोग्य, शिक्षण व पोषण यांवर निर्भर असतात. मात्र दारिद्यरेषेखाली अनेक भिन्न स्तर असतात व तेथेही आर्थिक विषमता आढळते. दारिद्य निर्मूलनासाठी हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

लोककल्याणकारी कार्यासाठी कायदेशीर तरतुदींची निर्मिती व अंमल-बजावणी आवश्यक असते. उदा., बालकामगारांचे शोषण थांबविण्यासाठी १९८६ साली बालकामगार प्रतिबंधक कायदा लागू झाला. तसेच स्त्रियांसाठी समान वेतन कायदा १९७६ साली संमत झाला. बालगुन्हेगार सुरक्षा योजना कायदा २००० साली लागू झाला व भूणहत्या प्रतिबंधक कायदा १९९४ साली संमत झाला. आज भारतातील वृद्घांचे प्रमाण वाढून ते ७·६ कोटींवर गेले आहे. १९९९ सालापासून वृद्घांसाठी कल्याणकारक योजना आखणी मंडळ, निवृत्ती योजना, वृद्घाश्रम व आरोग्यदायी सेवांचे आयोजन केले जाते.

मानवी जीवनाची प्रत तपासणे व त्याबाबत मानवी विकास अहवाल प्रसिद्घ करण्याचे कार्य संयुक्त राष्ट्रीय विकास आयोगातर्फे १९९० सालानंतर सुरु झाले. सुधारणा व विकास यांबाबत समाजकल्याणाची भूमिका व तत्त्वे आज मानव संसाधन विकासावर भर देण्याबाबत आगही आहेत. सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये समता, न्याय, धर्म-निरपेक्षता व दुर्बल घटकांचे हक्क जोपासण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम कल्याणदायी संघटनांनी करणे व त्यासाठी सतर्क राहणे, या आधुनिक काळातील मूलभूत गरजा आहेत.