Wikipedia

Search results

Friday 8 March 2013

जायकवाडी धरण

हिराकुड
जगातील सर्वात लांब धरण. ओरीसा राज्यातील महानदीवर संबलपुर पासुन १५ कि.मी. अंतरावर हे धरण बांधलेले आहे. हे धरण १९५६ साली बांधले गेले. १९३७ साली आलेल्या महापुरामुळे या धरणाची संकल्पना सर विश्वेश्वैरय्या यांनी मांडली. ह्या धरणाच्या सर्वेक्षणासाठी एक समिती नेमुन सर्वे करण्यात आला. या धरणाची कोनशिला ओरीसाया राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते १५ मार्च १९४६ साली ठेवली गेली. हिराकुड धरणाचे उद्घाटन १३ जानेवारी १९५७ साली पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झाले. या धरणाला एकुण खर्च १००.०२ करोड आला आहे. १९५६ पासुन शेतीला पाणीपुरवठा करण्याला सुरूवात झाली. आणि वीज उत्पादन १९६६ सालापासून सुरु झाली.

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
 दरवाजे  ,प्रकार : S - आकार ,   लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)
धरणाचा उद्देश - सिंचन, जलविद्युत
प्रवाह     गोदावरी नदी
स्थान     पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस -७५५ मि.मी.
लांबी     ९९९७.६७ मी..   उंची     ४१.३ मी.
बांधकाम सुरू- इ.स. १९६५  , उद्‍घाटन दिनांक -इ.स. १९७६
ओलिताखालील क्षेत्रफळ -३५००० हेक्टर
जलाशयाची माहिती-  क्षमता     २१७० दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ -३५० वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती  -  टर्बाइनांची संख्या-१  ,  स्थापित उत्पादनक्षमता -    १२ मेगावॉट.
पाणीसाठा  -  वापरण्यायोग्य क्षमता  : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३५००० हेक्टर,  ओलिताखालील गावे  : १०५
वीज उत्पादन-
जलप्रपाताची उंची  : ९४ फूट
जास्तीतजास्त विसर्ग  : ५० क्यूमेक्स ,   निर्मीती क्षमता  : १२ मेगा वॅट  ,  विद्युत जनित्र  : १

औरंगाबादचे जायकवाडी धरण हे देशातील धरणांपैकी एक महत्वाचे धरण आहे. जायकवाडी धरण हिवाळ्यात परदेशी पक्षांचे हक्काचे घर समजले जाते. या धरणात हजारो विदेशी पक्षी दाखल झाले आहेत या परदेशी पाहुण्यांना पाहण्यसाठी पर्यटकांनी जायकवाडी धरणावर गर्दी केली आहे.
हे पक्षाचे थवे कधी संथ गतीने नाथ सागरावर मुक्त विहार करताना पाहावयास मिळतात तर कधी आकाश कवेत घेताना दिसतात. हे परदेशी पक्षी काही दिवस पाहुणे म्हणून जायकवाडी धरणावर येतात आणि पक्षी मित्रांच्या मनात घर करून जातात.
अगदी रशिया, मध्य रशिया, सैबेरिया, युरोप, बलुचिस्तान यासह अन्य प्रांतातून हे पक्षी स्थंलतर करून हिवाळ्यात जायकवाडी धरणावर येतात. यामध्ये सर्वसाधारणपणे पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंग टिल, टफटेड पोचार्ड या बदकांची संख्या अधिक असते. तर गॉडवीट, गीन शॅंक, रेड शॅंक, सॅडपायपर, स्टीलट करल्यू, रफ ऍड रिव्ह, स्नाई या वेडर्स प्रकारातील पक्ष्यांचा मुक्त संचार असतो.
हे पक्षी काही कालावधीसाठी जायकवाडी धरणात थांबतात. जायकवाडी आणि परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पुन्हा सुरू होतो परतीचा प्रवास, आपल्या हक्काच्या घराकडे. औरंगाबादचे पक्षीमिञ दरवर्षी या पक्षाची जनगणना करतात.
सह्याद्रीच्या कुशीतील धरणांच्या पाण्याची वाफ होत असताना जायकवाडी धरण मात्र कोरडे आहे. केवळ शासकीय धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील धरणाचे पाणी जायकवाडीत सोडण्यात यावे, अशी मागणी गोदावरी पाणी हक्क संघर्ष समितीने केली आहे.
परभणी जिल्ह्यातील सिचनाचे क्षेत्र आता केवळ कागदावरच शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांची अवस्था बिकट आहे. वेळेवर पाणी मिळत नाही. आता तर जायकवाडीचे पाणी कायमचेच बंद झाल्यासारखी अवस्था आहे. जायकवाडीचे पाणी नसल्याने शेतकरी नैराश्येच्या गर्तेत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस ११२ टी.एम.सी. पाण्याचा वापर मंजूर असताना सुमारे १८७ टीएमसी पेक्षा जास्त पाणी अडविण्यात येते. त्यामुळे जायकवाडी धरण कधी तरी भरते. निळवंडे धरण ९९ टक्के भरलेले असून, या धरणाला कालवेच नाहीत. त्यामुळे धरणातील पाण्याची वाफ होत आहे. अशीच परिस्थिती भंडारदरा आणि दारणा या धरणांची आहे. सह्याद्रीच्या कुशीतील या धरणांची वाफ होत असताना मराठवाड्यातील गोदाकाठ मात्र पाण्याअभावी कोरडाठाक आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी तत्वाने जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परभणी येथून करण्यात आली आहे.
जवळपास ३०० द.ल.घ.मी. पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात यावे व एप्रिल व मे महिन्यात किमान ३ रोटेशन पाणी लाभक्षेत्रात उपलब्ध करून द्योव, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाक्रा नानगल
भारतातील पंजाब, हरयाणा व राजस्थान या तीन राज्यांनी संयुक्तपणे सतलज नदीवर उभारलेला सर्वात मोठा बहूद्देशीय प्रकल्प. हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूरच्या वायव्येस भाक्रा येथे एक भारस्थायी काॅंक्रीटचे धरण बांधण्यात आले. भाक्रा धरणाच्या खालच्या बाजूस सु. १३ किमी. अंतरावर रुपार जिल्हयातील नानगल येथे दुसरे धरण बांधण्यात आले. त्यातील पाण्याचा उपयोग मुख्यत्वे विजनिर्म्ाितीसाठी करुन घेण्यात आलेला आहे.

भाक्रा नानगल प्रकल्पास १९४६ मध्ये प्रारंभ झाला. यातील भाक्रा व नानगल ही दोन्ही धरणे तसचे नानगल हायडेल चॅनेल यांचे बांधकाम जुलै १९५४ मध्ये पूर्ण करण्यात आले. जानेवारी १९५५ मध्ये नानगल वीज उत्पादनकेंद्राच्या पूर्ततेनंतर प्रकल्पाची एकूण प्रतिष्ठापित वीज उत्पादनक्षमता ४८,००० किवॉ. होती. ती जुलै १९५६ मध्ये १९५८-५९ मध्ये भाक्रा धरणातून कालव्यांद्वारे पंजाब व राजस्थान राज्यांच्या काही भागांस पाणीपुरवठा होऊ लागला. हा २३६ कोटी रु. खर्चाचा संपूर्ण प्रकल्प १९६३ मध्ये पूर्ण होऊन २२ ऑक्टोबर १९६३ रोजी पंडीत नेहरुंच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. हा प्रकल्प म्हणजे 'देशाच्या प्रगतीचे प्रतीक' असे गौरवोदगार पंडितजींनी काढले. या प्रकल्पामुळे हरयाणा राज्यातील सर्व गावांना वीज उपलब्ध झाली, तसेच पंजाब व हरयाणा या दोन्ही राज्यांची कृषिक व औद्योगिक प्रगती शक्य झाली. राजस्थान राज्य व केंद्रशासित प्रदेश दिल्ली या दोघांनाही या प्रकल्पामुळे वीज उपलब्ध झाली आहे.


कोयना
पश्चिम महाराष्ट्र्रातील एक प्रचंड जलविद्युत् प्रकल्प. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमाजवळच कोयना नदीचा उगम आहे. कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. कोयना मात्र उत्तर दक्षिण दिशेने ६४ किमी. जाऊन व प्रतापगडला वळसा घालून हेळवाकजवळ पुर्वभिमुख होते. तेथून ५६ किमी. वरील कराडजवळ कोयनेचा कृष्णेशी संगम (प्रीतिसंगम) झाला आहे. कोयनेच्या ८९२.० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या खोर्‍यात सु. ५०८ सेंमी. पाऊस पडतो. कोयना खोरे सहयाद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून ४२७ मी. उंच आहे. या ठिकाणी जलविद्युत् प्रकल्प उभारण्याच्या योजनेस १९५४ च्या जानेवारीत प्रारंभ झाला.

मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्यातील एक स्थापत्यविशारद बिल यांनी १९०८-०९ साली महाराष्ट्र्रात दौरा करून तत्कालीन सरकारला निरनिराळया ३२ पाटबंधारे योजना सुचविल्या. त्यांत कोयना पाटबंधारे योजनेचा समावेश होता. परंतु त्याबाबतीत सरकारने कार्यवाही केली नाही. जमशेटजी टाटा यांनी १९२०-२५ सालांत पूर्ण केलेल्या मुळशी योजनेनंतर कोयना धरण योजना हाती घेण्याचा संकल्प सोडला होता. परंतु मुळशी धरणाविरूध्द सेनापती बापट यांनी उभारलेल्या सत्याग्रहामुळे टाटांची योजना बारगळली. अखेरीस स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात जागतिक बॅंकेने दिलेल्या १२ कोटी रू. किंमतीच्या परदेशी हुंडणावळीच्या साहाय्याने कोयना प्रकल्पास सुरूवात झाली.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विधमाने चालविला जातो.
सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टेपिंग पध्द्तीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.
कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. या लक्ष्मीचे कथास्तोत्र उषा तांबे यांनी 'कहाणी कोयनेची' या पुस्तकातून अतिशय साध्या, सोप्या व समर्पक मराठी भाषेत सांगितली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी अपार परिश्रम, निष्ठा, हातोटी, कसोटी लागते. प्रकल्पाची संकल्पना, योजना, आखणी, सर्वेक्षण याचा एएतिहासिक मागोवा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय, सामाजिक, अभियांत्रिकी औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील अनेकांची तपश्चर्या पुस्तकरूपाने प्रकाशात आणली नि कोयना प्रकल्प निर्मितीचा आनंद सर्वांपर्यंत पोचविला. बांधकामाची तांत्रिक पद्धत किचकट असते. त्यातून कोयना प्रकल्पाच्या बांधकामात बोगद्याचे काम प्रचंड प्रमाणात असल्याने अधिकच क्लिष्ट होती, तरीही अभियंत्यांनी अनेक संकटांना सामोरे जात प्रकल्प यशस्वी केला. भूगर्भ; तसेच भूपृष्ठ सर्वेक्षण, आखणी, बांधणी, बोगद्याचे खोदाईकाम आदी बांधकामांची माहिती हे तपशील अत्यंत सुबोध भाषेत वर्णन केले आहेत.

ऊर्जाविषयाची मूलतत्त्वे देऊन वीज-ऊर्जेची ओळख, औष्णिक वीज व जलविद्युत यांचे सैद्धांतिक आर्थिक मुदद्यांसह तौलनिक विश्लेषण केले आहे. वीज वितरण व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करताना वीजबचतीचा उल्लेख केला आहे. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील जलाशयविधन (सेक टॅपिंग) या अभिनव धाडसी प्रयत्नातील नाटय व थरार सांगून या शाआरYयगाथेच्या मानकरी अभियंत्यांचा गौरव केला आहे.
विस्थापितांचे पुनर्वसन हा आजही एएरणीवर असलेला प्रश्न, भूसंपादन, जंगलनाश, पर्यावरण, नुकसानभरपाई, रोजगार, शेती, रस्ते, शाळा, आरोग्य, कौटुंबिक-सामाजिक-सांस्कृतिक जीवन, मानसिकता आदी बाबींचे वर्णन शासनास व समाजास मार्गदर्शन करणारे आहे. रक्षण निसर्गाचे का माणसाचे, असा प्रश्न उपस्थित करून धरणामुळे निसर्गाचा असमतोल होत नाही हे जागतिक अनुभवांनी स्पष्ट केले आहे. कोयना भूकंप संकटांची कथा सांगताना प्राणहानी, वित्तहानी, लोकांचे धआरYय, पुनर्वसन, धरण मजबुती बांधकाम आदी माहिती दिली आहे. धरणामुळे भूकंप होत नाही ही तज्ज्ञांची ग्वाही स्पष्ट केली आहे.

1 comment:

  1. महाराष्ट्रातील जयकवाडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणत्या देशाने सहकार्य केला आहे

    ReplyDelete