Wikipedia

Search results

Wednesday 10 April 2013

कवी सौमित्र यांच्या कविता


आईला वाटत असेल…….

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो
उघडतो कपाटं, फोडतो कुलपं, पुस्तकं धुंडाळतो, खीसे चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलयं की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प, मलूल बसून राहतो, मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण निसटल्यागत पिंज-यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परततो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास, तापास, पूजा, अर्चा सांगुन कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातां सोबत ,
- सौमित्र ( किशोर कदम )

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

 

पहिला पाऊस

पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण

गीतकार :सौमित्र
गायक :सौमित्र
संगीतकार :मिलींद इंगळे
चित्रपट :गारवा



त्याचं-तिचं आज break-up झालंय…

 

काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय…
ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं…
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय…

 

माझिया मना, जरा थांब ना

माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणे
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना

गीतकार :सौमित्र
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके

 

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

 

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही ॥धृ.॥
भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई ॥१॥
असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई ॥२॥
आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही ॥३॥

1 comment:

  1. त्याचं-तिचं आज ब्रेकअप झालंय ....मस्त आहे सर

    Marathi Motivation

    ReplyDelete