Wikipedia

Search results

Saturday 4 May 2013

ज्वालामुखी


ज्वालामुखी ही भूकवचात असलेली भेग असून, उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे, लाव्हारस, राख, पाण्याची वाफ व अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवच झालेल्या भागात अशा भेगा आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे घन व वितळलेल्या स्वरुपातील द्रव्य भेगेच्या मुखाशेजारी साचून ज्वालामुखींचा शंकू निर्माण होतो, किंवा त्याल एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो.

नरसाळयाच्या आकाराचा खळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. या खळग्याला ज्वालाकुंड म्हणतात. जपानमधील फयुजियामा, इटलीतील व्हेसूव्हियस, इक्केडॉरमधील कोरोपॅक्सी ही ज्वालामुखीची उदाहरणे होत. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांच्या पूर्वेकडील बॅरन बेट हे ज्वालामुखीच्या टेकडीचे उदाहरण आहे. उद्रेकांच्या पुनरावृत्तीवरनुसार ज्वालामुखीचे जागृत. निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते. व्हेसुव्हियस व क्रॅकाटोआ हे बर्‍याच काळपर्यंत मृतावस्थेत असल्यासारखे वाटत होते. पण अलीकडे त्यांना उद्रेक घडून आलेत. जावा व सुमात्र बेटांमध्ये असलेल्या संंुडा सामुद्रधुनीतील क्रॅकाटोआ बेट असून, त्यावर क्रॅकटोआ ज्वालामुखी आहे. अलीकडच्या काळात १८८३ मध्ये या ज्वालामुखीत प्रचंड उद्रेक घडून आला होता. या उद्रेकात त्याचे शिखरच उद्धवस्त झाले व त्यामुळे समुद्रात १६ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा निर्माण झाल्या व पश्चिम जावातील ३६,००० लोक यात मृत्यूमुखी पडले. खडकाचे तुकडे व लाव्हारस ८०० मीटर उंचीपर्यंत उडाले होते. ज्वालामुखीची धूळ, राख व धूर २७ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या उद्रेकाचा आवाज पश्चिमेकडे तर्कस्तानातील इस्तबूंपर्यत तर पूर्वेला टोकिओपर्यंत ऐकला गेला होता.

पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील शीलारस-मॅग्मा-बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायूलोट आणि राखे सदृश्य असे खडकाचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो त्याला ज्वालामूखी हे नाव देतात.

ज्वालामूखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट धूरासारखे दिसणारे खडकांच्या सुक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वावरुन ही एक पेटलेली निर्सर्गाची भटटी आहे असे वाटणे साहजिक होते. त्यामूळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या खडकांच्या लहान मोठया कणांनाही राख अंगार-निखारे-अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक क्रियेत घडून येत नसते कचित बाहेर पडणार्‍या वायूपैकि गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.

जमिनीवर येण्यापूर्वी भुष्ठभागावर आला कि, त्यात विरघळलेले बहूतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडु लागतात ज्या शिलारसातून बहूतेक वायू निघुन गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.

मध्यवर्ती निर्सग द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामूखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालच्या शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुूळे बाजुच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकुच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो.
ज्वालामुखीय क्रिया :

भूपृष्ठाखाली अनेक कारणांनी शिलारस तयार होतो. हा शिलारस भूपृष्ठाला फोडून वर येतो. काही वेळा शिलारस भूपृष्ठावर न येता खालीच थंड होतो. या सर्व क्रियांना ज्वालामुखीय क्रिया असे म्हणतात. ज्वालामुखीय क्रिया फार पुरातन काळापासून घडत आहेत.
ज्वालामुखीचा उद्रेक :

भूपृष्ठाखालून शिलारस पृष्ठभागावर येणे यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी मोठा गडगडाट होतो व तेथील भूपृष्ठाला भूकंपाचे धक्के बसतात, तसेच त्या प्रदेशातील जमिनीचे तापमान वाढते. उद्रेकाच्या वेळी नळीसारख्या मार्गाने भूपृष्ठाखालील भागातून लाव्हारस, पाण्याची वाफ, दगडांचे तुकडे, धुळ व वायुपदार्थ वेगाने बाहेर पडतात.

भूपृष्ठातील नळीसारख्या मार्गाचे भूपृष्ठाकडील मुख म्हणजे ज्वालामुखीय विवर होय. उद्रेक होताना आकाशात वर फेकला गेलेला लाव्हा घन तुकडयांच्या स्वरूपात खाली पडत असतो. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे ज्वालामुखीय धुळ पाण्यात मिसळून उष्ण चिखलाचे प्रवाह वाहू लागतात.
ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार :

भूपृष्ठातून शिलारस कसा बाहेर पडतो, या आधारे ज्वालामुखी उद्रेकांचे दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. केंद्रीय उद्रेक २. भेगी उद्रेक
१. केंद्रीय उद्रेक :


हा उद्रेक काही वेळा विस्फोटक स्वरूपाचा असतो. कारण भूपृष्ठातील एका नळीसारख्या अरुंद मार्गातून लाव्हा, वाफा, वायू, धूळ, धूर, दगड इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. केंद्रीय उद्रेकातील पदार्थ साचल्यामुळे शंक्वाकार पर्वत व घुमटाकार टेकडयांची निर्मिती होते.

आफ़्रिकेतील किलिमांजारो, जपानमधील फुजियामा, इटलीतील व्हेसुव्हिअस व माऊंट एटना ही केंद्रीय उद्रेकामुळे निर्मित ज्वालामुखी पर्वतांची काही उदाहरणे आहेत. भारतात सन १९९४ मध्ये अंदमान द्वीपसमुहातील बॅरन बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
२. भेगी उद्रेक :

भूपृष्ठाला लांबच लांब भेग पडते. त्यामुळे आतील शिलारस, दगड, वाफ, वायू हे हळूहळू बाहेर पडतात. हे उद्रेक अगदी संथ गतीने घडून येतात. हा लाव्हारस अधिक तरल असल्याने दूरवर पसरतो. कालांतराने भूपृष्ठावर लाव्हारस थंड होतो व तेथील भूपृष्ठाची जाडी वाढते. या उद्रेकापासून बेसाल्ट खडकाची पठारे निर्माण होतात.

ज्वालामुखी तीन प्रकारचे असतात. जागृत, निदिस्त, आणि मृत. जागृत ज्वालामुखी उद्रेकाची क्रिया सतत चालू असते. निदिस्त ज्वालामुखीतून अनिश्चित कालानंतर उद्रेक होतो. तर मृत ज्वालामुखीतून उद्रेक होण्याची क्रिया पूर्णपणे थांबलेली असतेे.

(१) पॅसिफिक महासागराभोवतालचा प्रदेश, यास 'अग्निकंकण' असेही म्हणतात. सर्वाधिक ज्वालामुखी याच विभागात आढळतात. (२) भूमध्यसागरी विभाग-आल्प्स पर्वत व द. युरोप. याशिवाय उ. अटलांटिक व हिंदी महासागरातील काही बेटांवर ज्वालामुखी आहेत. भारतात अंदमान समुहातील बॅरन व्दिप हा एकमेव ज्वालामुखीय प्रदेश आहे.

जगातील सुमारे ८५० ज्वालामुखीपैकी सुमारे ८० समुद्राअंतर्गत आहेत. सुमारे ५०० ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या परिघावर आहेत.
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ

या पदार्थाचे तीन प्रकार पडतात. ज्वालामुखीच्या भेगेतून बाहेर पडणारा द्रवरुप पदार्थ म्हणजे लाव्हारस. नुकताच बाहेर पडलेला लाव्हारस अतिशय उष्ण असतो व त्याचे तापमान ६०० ते १,२०० सेल्सिअसपर्यंत असते. भस्मिक लाव्हा जास्त प्रवाही असतो व तो दूरपर्यत वाहत जातो. लाव्हारस वाहण्याची गती जमिनीच्या उतारावरही अवलंबून असते. हा वेग दर ताशी ८० किलोमीटरपर्यंत असू शकतो. बर्‍याच वेळा भेगेतच लाव्हा साचून घट्ट होतो. पण आता कोंडलेल्या वायंुच्या वाढत्या दाबामुळे भेगेत घट्ट झालेला लाव्हा जोरदार उद्रेकामुळे वर उडून जाऊ शकतो. अशा वेळी भेगेच्या शेजारचे खडकही बाहेर फेकले जातात. बाहेर फेकलेले खडक भेगेच्या मुखाशी साचून राहतात. त्यामुळेच ज्वालाकुंड व शंकूची निर्मिती होते. खडकांचे बहुसंगायित प्रस्तर, लहान तुकडे, ज्वालामुखीची राख व धूळ, इत्यादी द्रवरुप पदार्थ आणि विविध प्रकारचे वायू पाण्याची वाफ, वायुरुप अवस्थेतील हैड्रोजन व कार्बन डायऑक्साईड, इत्यादी वायुरुप पदार्थ त्यातून बाहेर पडतात.
लाव्हा बाहेर पडण्याची पध्दत

लाव्हा बाहेर पडण्याच्या पध्दतीनुसार मध्यवर्ती ज्वालामुखी व लांब भेगेचे ज्वालामुखी असे दोन प्रकार केले जातात. मध्यवर्ती प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विशिष्ट शंकू व ज्वालामुख असलेल्या टेकडयांची व पर्वतांची निर्मिती होते. या प्रकारच्या ज्वालामुखीतून कोंडलेली वाफ व वायू अकस्मात स्फोट होऊन बाहेर पडतात. व्हेसुव्हियस व फुजियामा ही या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत.

लांब भेगेच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. लाव्हाचे थर सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरत जातात. दख्खनच्या पठाराचा ५,००,००० चौसर किलोमीटरचा प्रदेश या पध्दतीने निर्माण झालेला आहे.
पर्मिअन एक्स्टींशन

सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास फार अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रे (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रे मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.

द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो


 टोबाचे तांडव
कुकडी ही नदी, पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक. कल्याण जवळच्या नाणेघाटात तिचा उगम. पुढे जुन्नरच्या जवळून वहात जाऊन ती भीमा नदीला मिळते. जुन्नरच्या थोडे पुढे, या नदीच्याच काठांवर बोरी खुर्द व बोरी बुद्रुक अशी दोन अगदी सर्व सामान्य खेडेगावे आहेत. या गावांच्या जवळ असलेले कुकडीचे पात्र मात्र मोठे वैशिटयपूर्ण आहे. या ठिकाणी असलेले पात्र, एका खडकाळ अशा दरीतून वहाते. पात्राची खोली फारशी नसली तरी पात्र भरपूर रूंद मात्र आहे.नदीच्या दोन्ही काठांना ‘बॅसॉल्ट’ प्रकारच्या खडकांचे उभे सरळ रेषेत तुटलेले कडे आहेत. 1960 च्या आसपास या गावाच्या आसपास असलेल्या नदीच्या पात्राजवळ अष्मयुगातील मानवी हत्यारे सापडल्यामुळे उत्खननशास्त्रज्ञांचे या जागेकडे लक्ष होतेच. पण 1986-1988 च्या आसपास नदीच्या काठांना असलेल्या उभ्या कडयांच्यामधे ‘ टेफरा’ या घन पदार्थाचे 2 मीटर किंवा 6 फूट जाडीचे थर भूगर्भशास्त्रज्ञांना आढळून आले व बोरी गावाचा परिसर आंर्तराष्ट्रीय शास्त्रज्ञ समुदायात एका वेगळयाच कारणासाठी प्रसिध्दिझोतात आला.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत घडामोडी होत असतात. पाउस व वितळणारा बर्फ यांनी सतत जमिनीची धूप होत असते तर उलट सुलट वाहणाऱ्या वाऱ्यांनी पृष्ठभागावरील धूळ सगळीकडे पसरत असते. पावसाचे पाणी नद्या नाल्यांमधून वहाते व नदी काठच्या सखल भागात वहात आणलेला चिखल पसरते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालूच राहते. लाखो वर्षानंतर या साठलेल्या धुळीचे कठिण असे दगड बनतात. कालांतराने या पैकी एखादा समुद्र तळ हिमालया सारखा किंवा मध्य अमेरिकेसारखा वर उचलला जातो. तर नद्यांमुळे ग्रॅन्ड कॅनियन सारखी खोल दरी तयार होते. भूकंपामुळेही कडे कोसळतात व एखादा दोन तीन मैल उंचीचा उभा कडा उभा रहातो. या सर्व घडामोडींमुळे पृथ्वीचा इतिहास ज्यावर उभा छेद घेऊन आलेखित केला आहे असे कडे पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आढळतात. या कडयांच्या तळापासून ते वरच्या थरापर्यंत पृथ्वीच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा आलेख मोठया अचूकपणे नोंदला जातो.
एखाद्या ज्वालामुखीचा जेंव्हा उद्रेक होतो तेंव्हा त्याच्या मुखातून राखेसह अनेक घन पदार्थ फेकले जातात. ही राख व हे घन पदार्थ कांही कालाने परत जमिनीवर जमा होतात. पांदरट रंगाच्या या घन पदार्थांच्या थरांना शास्त्रीय परिभाषेत ‘टेफरा’ (Tephra) असे नाव आहे. नदीच्या काठी असलेल्या उभ्या कडयांच्या छेदात जर ‘टेफरा’ घन पदार्थाचे थर आढळून आले तर कधीतरी तो भूभाग ज्वालामुखीने फेकलेल्या घन पदार्थांचे आवरणाखाली झाकला गेला होता हे सप्रमाण सिध्द होते. बोरी गावाजवळ आढळून आलेल्या ‘टेफरा’ घन पदार्थाच्या थराचा उत्खननशास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्यांनी ते थर बऱ्याच जुन्या काळातील ( 15 लक्ष वर्षांपूर्वीचे)असावेत असे अनुमान काढले होते व त्यांच्या दृष्टीने ते थर आदिमानव कालाच्या फारच पूर्वीचे असल्याने फारसे महत्वाचे नव्हते.
ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी तो अणुबॉम्ब च्या (किंवा आण्विक अपघाता)पेक्षा कैक सुरक्षित आहे… सबब आपण सौरउर्जेनंतर ज्वालामुखीची ऊर्जा, समुद्रावरील ऊर्जा ह्यांचाच वि४ करणे अधिक योग्य आहे…
जेम्स बॉण्डच्च्याच एका चित्रपटात (बहुतेक गोल्डफिंगर) एक मस्त वाक्य आहे “Don’t start something that you can NOT stop”. आणि हे वाक्य अगदी सद्यउपयुक्त विवादामध्ये सूचक ठरणार आहे…
जगातल्या (माफ करा पृथ्वीवरील…) सर्व अणुउर्जेचा प्रसार आणि उपयोग करणाऱ्या देशांना खुले आवाहन की त्यांनी आपली सर्व तंत्रज्ञान शक्ती आणि बुद्धीमत्ता पणाला लावून १५ मे पूर्वी जपानमधिल आण्विक प्रदूषण थांबवून दाखवायचे… अन्यथा आपापली शेपूट दोन पायात घालून गुपचूप पडायचे…
ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्याचा अनुभव इतर कोणालाही इजा न करता घेता येतो… कसा? मूळव्याध प्रज्वलित झालेल्या व्यक्तीला विचारा… (मारुतीच्या बेंबीत बोट घातले की कसे वाटते?)
400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक
प्रेषक चंद्रशेखर (सोम, 08/30/2010 - 05:59)

    आंतरराष्ट्रीय
    माहिती

इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.
एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेले भोक असते ज्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील लाव्हारस, उष्ण वायू, राख इत्यादि बाहेर पडतात.
ज्वालामुखी ही भूकवचात असलेली भेग असून, उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे, लाव्हारस, राख, पाण्याची वाफ व अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवच झालेल्या भागात अशा भेगा आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे घन व वितळलेल्या स्वरुपातील द्रव्य भेगेच्या मुखाशेजारी साचून ज्वालामुखींचा शंकू निर्माण होतो, किंवा त्याल एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो.

जमिनीच्या पृष्ठभागाला छेद देत "मॅग्मा' (ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी त्या विवरात उकळत असलेल्या द्रवाला मॅग्मा म्हणतात) त्याचप्रमाणे राख, वायू बाहेर पडतात, या प्रक्रियेला ढोबळ मानाने ज्वालामुखी म्हणता येईल. उद्रेकातून "मॅग्मा' बाहेर पडल्यावर त्याचे लाव्ह्यात रूपांतर होते. लाव्ह्याचे तापमान ६०० ते ११०० अंश सेल्सिअस इतके असू शकते. सिसिलीमध्ये असलेल्या "व्हल्कॅनो' बेटाच्या नावावरून ज्वालामुखीला "व्होल्कॅनो' हे नाव पडल्याचे मानले जाते. रोमन भाषेत अग्निदेवतेचे नाव "व्हल्कन' असे आहे. त्यावरून हा शब्द प्रचलित झाला असल्याचे मानतात.

भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे (टेक्‍टॉनिक प्लेट्‌स) काही ठिकाणी जमिनीचे कवच ठिसूळ बनते, प्रामुख्याने अशा ठिकाणीच ज्वालामुखी आढळतात. त्याचप्रमाणे महासागराच्या तळाशी सुरू असलेल्या जमिनीच्या सततच्या हालचालींमुळेही ज्वालामुखीचा उद्रेक होतो. समुद्राच्या तळाशी जमिनीचे आवरण ठिसूळ झालेले असते. त्यामुळे बहुतांश ज्वालामुखी महासागरात आढळतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे विविध प्रकार असतात... "फ्रियाटिक इरप्शन' (उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडणे), "ऱ्हिओलाईट इरप्शन' (सिलिकाचा समावेश असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक). या उद्रेकातून लाव्हा, राख याबरोबरच कार्बन डायऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्‍लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड, कार्बन मोनॉक्‍साईड असे विविध विषारी वायू बाहेर पडतात.

मोठ्या क्षमतेच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होणारे परिणाम भयानक असतात. त्यातून उत्सर्जित झालेले विषारी वायू पर्यावरणावर दीर्घ काळ परिणाम घडवितात. त्यातून बाहेर पडणारे कार्बन डायऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्‍लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड, कार्बन मोनॉक्‍साईड असे वायू पर्यावरणाला आणि सजीवांना अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे सूर्याची नीलकिरणे पृथ्वीपर्यंत पोचू न देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ओझोनच्या थरालाही धक्का पोचू शकतो. अशा ज्वालामुखीच्या आसपास राहणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास होण्याची शक्‍यता असते. "मॅग्मा' आणि इतर वायूंमुळे तयार होणाऱ्या दाबामुळे ज्वालामुखीचा स्फोट होतो. मोठ्या दाबामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचा वेग अतिशय जोरात असतो. त्याचबरोबर सुमारे १२०० अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान घेऊन तो वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी आडव्या करत वेगाने पुढे वाहत असतो. डोंगरउतारावरून वाहणाऱ्या लाव्ह्यामुळे भूस्खलन होण्याचीही शक्‍यता असते. त्यातून बाहेर पडणारी राख आणि वायूंमुळे श्‍वसनाचे विकार बळावू शकतात. प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्धांना त्याचा त्रास होण्याची शक्‍यता असते. गेल्या ३०० वर्षांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमारे दोन लाख ६० हजार जण मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. जगातील एकूण ज्वालामुखींपैकी ९० टक्के ज्वालामुखी प्रशांत महासागराच्या परिसरात असल्याचे मानले जाते. त्याला "रिंग ऑफ फायर' असे नामाभिधान करण्यात आले आहे. एकूण ज्वालामुखींपैकी १९०० ज्वालामुखी जागृत मानले जातात.

फादर ब्लास देल क्रस्टिलो याला ज्वालामुखीचा पहिला अभ्यासक मानले जाते. निकाराग्वातील मसाया येथील जागृत ज्वालामुखीच्या विवरात तो १३ एप्रिल १५३८ या दिवशी उतरला. त्या विवरात असलेल्या "मॅग्मा'चे, तेथील खडकांचे त्याने नमुने घेतले. त्याने केलेल्या या धाडसानंतरच खऱ्या अर्थाने ज्वालामुखीच्या अभ्यासाला सुरवात झाली, असे मानले जाते.
व्हेसुव्हियस व क्रॅकाटोआ हे बर्‍याच काळपर्यंत मृतावस्थेत असल्यासारखे वाटत होते. पण अलीकडे त्यांना उद्रेक घडून आलेत. जावा व सुमात्र बेटांमध्ये असलेल्या संंुडा सामुद्रधुनीतील क्रॅकाटोआ बेट असून, त्यावर क्रॅकटोआ ज्वालामुखी आहे. अलीकडच्या काळात १८८३ मध्ये या ज्वालामुखीत प्रचंड उद्रेक घडून आला होता. या उद्रेकात त्याचे शिखरच उद्धवस्त झाले व त्यामुळे समुद्रात १६ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा निर्माण झाल्या व पश्चिम जावातील ३६,००० लोक यात मृत्यूमुखी पडले. खडकाचे तुकडे व लाव्हारस ८०० मीटर उंचीपर्यंत उडाले होते. ज्वालामुखीची धूळ, राख व धूर २७ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या उद्रेकाचा आवाज पश्चिमेकडे तर्कस्तानातील इस्तबूंपर्यत तर पूर्वेला टोकिओपर्यंत ऐकला गेला होता.

मृत ज्वालामुखी'
निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते.

ज्वालामुखीय क्रिया :
भूपृष्ठाखाली अनेक कारणांनी शिलारस तयार होतो. हा शिलारस भूपृष्ठाला फोडून वर येतो. काही वेळा शिलारस भूपृष्ठावर न येता खालीच थंड होतो. या सर्व क्रियांना ज्वालामुखीय क्रिया असे म्हणतात. ज्वालामुखीय क्रिया फार पुरातन काळापासून घडत आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक :
भूपृष्ठाखालून शिलारस पृष्ठभागावर येणे यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी मोठा गडगडाट होतो व तेथील भूपृष्ठाला भूकंपाचे धक्के बसतात, तसेच त्या प्रदेशातील जमिनीचे तापमान वाढते. उद्रेकाच्या वेळी नळीसारख्या मार्गाने भूपृष्ठाखालील भागातून लाव्हारस, पाण्याची वाफ, दगडांचे तुकडे, धुळ व वायुपदार्थ वेगाने बाहेर पडतात.
भूपृष्ठातील नळीसारख्या मार्गाचे भूपृष्ठाकडील मुख म्हणजे ज्वालामुखीय विवर होय. उद्रेक होताना आकाशात वर फेकला गेलेला लाव्हा घन तुकडयांच्या स्वरूपात खाली पडत असतो. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे ज्वालामुखीय धुळ पाण्यात मिसळून उष्ण चिखलाचे प्रवाह वाहू लागतात.

ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार :
भूपृष्ठातून शिलारस कसा बाहेर पडतो, या आधारे ज्वालामुखी उद्रेकांचे दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. केंद्रीय उद्रेक २. भेगी उद्रेक
१. केंद्रीय उद्रेक :
हा उद्रेक काही वेळा विस्फोटक स्वरूपाचा असतो. कारण भूपृष्ठातील एका नळीसारख्या अरुंद मार्गातून लाव्हा, वाफा, वायू, धूळ, धूर, दगड इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. केंद्रीय उद्रेकातील पदार्थ साचल्यामुळे शंक्वाकार पर्वत व घुमटाकार टेकडयांची निर्मिती होते.
आफ़्रिकेतील किलिमांजारो, जपानमधील फुजियामा, इटलीतील व्हेसुव्हिअस व माऊंट एटना ही केंद्रीय उद्रेकामुळे निर्मित ज्वालामुखी पर्वतांची काही उदाहरणे आहेत. भारतात सन १९९४ मध्ये अंदमान द्वीपसमुहातील बॅरन बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

२. भेगी उद्रेक :
भूपृष्ठाला लांबच लांब भेग पडते. त्यामुळे आतील शिलारस, दगड, वाफ, वायू हे हळूहळू बाहेर पडतात. हे उद्रेक अगदी संथ गतीने घडून येतात. हा लाव्हारस अधिक तरल असल्याने दूरवर पसरतो. कालांतराने भूपृष्ठावर लाव्हारस थंड होतो व तेथील भूपृष्ठाची जाडी वाढते. या उद्रेकापासून बेसाल्ट खडकाची पठारे निर्माण होतात.
ज्वालामुखी तीन प्रकारचे असतात. जागृत, निदिस्त, आणि मृत. जागृत ज्वालामुखी उद्रेकाची क्रिया सतत चालू असते. निदिस्त ज्वालामुखीतून अनिश्चित कालानंतर उद्रेक होतो. तर मृत ज्वालामुखीतून उद्रेक होण्याची क्रिया पूर्णपणे थांबलेली असते.

ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून बाहेर पडणारे विविध वायू, लाव्ह्याची तीव्रता आणि त्याचबरोबर त्याचा उद्रेक कोणत्या भागात होतो, यावरून त्याचे विविध प्रकार पडतात. "स्ट्राटोव्होल्कॅनो', "सुपर व्होल्कॅनो', "सबमरिन व्होल्कॅनो', असे ज्वालामुखीचे विविध प्रकार शास्त्रज्ञांनी नमूद केले आहेत.

स्ट्राटोव्होल्कॅनो : याला "कंपोझिट व्होल्कॅनो' असेही म्हणतात. या ज्वालामुखीतून एकाआड एक अशा पद्धतीने लाव्हा आणि इतर उत्सर्जित पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे त्याच्या उद्रेकातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागाची निर्मिती होते. त्यात सिंडर्स, राख आणि लाव्ह्याचा समावेश असतो. सिंडर्स आणि राखेचे प्रथम उत्सर्जन होते आणि त्यानंतर त्यांच्यावरून तप्त लाव्हा वाहण्यास सुरवात होते. जपानमधील माऊंट फुजी येथील ज्वालामुखी या प्रकारच्या ज्वालामुखीचे उदाहरण आहे. अशा प्रकारचे ज्वालामुखी सर्वात धोकादायक मानण्यात येतात.

सुपर व्होल्कॅनो : अशा ज्वालामुखीच्या उद्रेकातून सल्फर आणि राखेचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. सल्फर मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरल्यास, त्याचा परिणाम तापमानावर होते. तापमानात मोठी घट होते. त्यामुळे या उद्रेकानंतर शीतलहर येण्याची शक्‍यता असते. बराच मोठा भूभाग अशा ज्वालामुखीच्या तडाख्यात येणे शक्‍य असते. न्यूझीलंडमधील लेक ताओपो हे याचे उत्तम उदाहरण आहे.

सबमरिन व्होल्कॅनो : या ज्वालामुखीचा उद्रेक प्रामुख्याने सागरतळाशीच होतो. सागरतळाशी भूपृष्ठ बऱ्याच प्रमाणात ठिसूळ झाल्यामुळे हे ज्वालामुखी कायम जागृत स्वरूपात असतात. त्याचा उद्रेक महासागराच्या पृष्ठभागावरही सहज दिसू शकतो.

(१) पॅसिफिक महासागराभोवतालचा प्रदेश, यास 'अग्निकंकण' असेही म्हणतात. सर्वाधिक ज्वालामुखी याच विभागात आढळतात. (२) भूमध्यसागरी विभाग-आल्प्स पर्वत व द. युरोप. याशिवाय उ. अटलांटिक व हिंदी महासागरातील काही बेटांवर ज्वालामुखी आहेत. भारतात अंदमान समुहातील बॅरन व्दिप हा एकमेव ज्वालामुखीय प्रदेश आहे.
जगातील सुमारे ८५० ज्वालामुखीपैकी सुमारे ८० समुद्राअंतर्गत आहेत. सुमारे ५०० ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या परिघावर आहेत.
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ

या पदार्थाचे तीन प्रकार पडतात. ज्वालामुखीच्या भेगेतून बाहेर पडणारा द्रवरुप पदार्थ म्हणजे लाव्हारस. नुकताच बाहेर पडलेला लाव्हारस अतिशय उष्ण असतो व त्याचे तापमान ६०० ते १,२०० सेल्सिअसपर्यंत असते. भस्मिक लाव्हा जास्त प्रवाही असतो व तो दूरपर्यत वाहत जातो. लाव्हारस वाहण्याची गती जमिनीच्या उतारावरही अवलंबून असते. हा वेग दर ताशी ८० किलोमीटरपर्यंत असू शकतो. बर्‍याच वेळा भेगेतच लाव्हा साचून घट्ट होतो. पण आता कोंडलेल्या वायंुच्या वाढत्या दाबामुळे भेगेत घट्ट झालेला लाव्हा जोरदार उद्रेकामुळे वर उडून जाऊ शकतो. अशा वेळी भेगेच्या शेजारचे खडकही बाहेर फेकले जातात. बाहेर फेकलेले खडक भेगेच्या मुखाशी साचून राहतात. त्यामुळेच ज्वालाकुंड व शंकूची निर्मिती होते. खडकांचे बहुसंगायित प्रस्तर, लहान तुकडे, ज्वालामुखीची राख व धूळ, इत्यादी द्रवरुप पदार्थ आणि विविध प्रकारचे वायू पाण्याची वाफ, वायुरुप अवस्थेतील हैड्रोजन व कार्बन डायऑक्साईड, इत्यादी वायुरुप पदार्थ त्यातून बाहेर पडतात.

लाव्हा बाहेर पडण्याची पध्दत
लाव्हा बाहेर पडण्याच्या पध्दतीनुसार मध्यवर्ती ज्वालामुखी व लांब भेगेचे ज्वालामुखी असे दोन प्रकार केले जातात. मध्यवर्ती प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विशिष्ट शंकू व ज्वालामुख असलेल्या टेकडयांची व पर्वतांची निर्मिती होते. या प्रकारच्या ज्वालामुखीतून कोंडलेली वाफ व वायू अकस्मात स्फोट होऊन बाहेर पडतात. व्हेसुव्हियस व फुजियामा ही या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत.
लांब भेगेच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. लाव्हाचे थर सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरत जातात. दख्खनच्या पठाराचा ५,००,००० चौसर किलोमीटरचा प्रदेश या पध्दतीने निर्माण झालेला आहे.

आइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक आहे की या राखेचा ढग अंदाजे 20000 फूट उंचीवरून आग्नेय दिशेला पसरत चालला आहे. वार्‍याची दिशा हीच असल्याने, अमेरिका खंड या राखेच्या ढगापासून वाचले असले तरी हा ढग युरोपवर पसरला आहे. त्यामुळे युरोपवरची विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. अर्थात हे सगळे तात्पुरते परिणाम आहेत. दोन चार दिवसानंतर हा ढग विखुरला की उड्डाणे पुन्हा पूर्ववत होतील अशी आशा आहे.
या ज्वालामुखीचा याच तीव्रतेचा उद्रेक, याच्या आधी डिसेंबर 1821मधे झाला होता व तो जानेवारी 1823 पर्यंत चालू राहिला होता. या वेळेस जर मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर मात्र युरोप मधला विमान उद्योग मोठ्याच संकटात सापडू शकतो. असे जरी असले तरी शास्त्रज्ञांना वाटणारी खरी भिती काही निराळीच आहे.
‘ एव्हलूब ‘ हा ज्वालामुखी आइसलॅन्डमधल्या इतर ज्वालामुखींच्या मानाने बच्चा ज्वालामुखी समजला जातो. या देशात असलेल्या सुमारे 35 ज्वालामुखीमध्ये ‘ हेकला ‘(Hekla), ‘ काटला ‘(Katla) व ‘ ग्रिम्स्व्होट्न ‘(Grimsvotn) हे तीन ज्वालामुखी, बडे किंवा दादा ज्वालामुखी समजले जातात. या तीन बड्या ज्वालामुखींपैकी ‘ काटला ‘ या ज्वालामुखीची भिती आइसलॅन्ड मधल्या नागरिकांना सर्वात अधिक वाटते. या ज्वालामुखीचे मुख साधारण 10 किलोमीटर व्यासाचे आहे व तो 5000 फूट उंचीवर असल्याने या ज्वालामुखीच्या उद्रेकात, महाप्रचंड पूर येऊ शकतात. 1918 मधे या ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. सध्या या ज्वालामुखीच्या मुखावरून हिमनद वहात असल्याने, बर्फाच्या मोठ्या जाडीच्या थरांनी हे मुख, बूच बसवल्यासारखे बंद केले गेले आहे. ‘एव्हलूक ‘ व ‘ काटला ‘ हे दोन्ही ज्वालामुखी एकमेकाजवळच आहेत.
बुधवारच्या ‘ एव्हलूब ‘ च्या उद्रेकाने, शास्त्रज्ञाना खरी भिती अशी वाटते आहे की हा उद्रेक जर बराच काल चालू राहिला तर या ज्वालामुखीतून वहात असलेल्या लाव्हा रसामुळे, ‘ काटला ‘ ज्वालामुखीच्या मुखावरचे, बर्फाचे बूच वितळून जाईल व या ज्वालामुखीचा मोठा विस्फोट होऊन लाखो टन राख आकाशात फेकली जाईल. 1991 मधे फिलिपाईन्स देशातल्या ‘ पिनाट्यूबो ‘ ज्वालामुखीने दोन दिवसात पृथ्वीपासून 70000 फूट अंतर उंचीपर्यंत राख फेकली होती व त्यामुळे जगभरातले तपमान 0.4 डिग्री सेल्सियसने कमी झाले होते.
याच हिशोबाने ‘ काटला ‘ ज्वालामुखीचा उद्रेक, जगाला डीप फ्रीझ मधे टाकू शकतो. अठराव्या शतकात जेंव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता तेंव्हा संपूर्ण अमेरिका खंडाला अतिशय तीव्र असा शीतकाल सहन करावा लागला होता. अमेरिकेतील मिसिसिपी नदी, न्यू ऑर्लिन्स या शहराजवळ मेक्सिकोच्या आखाताला मिळते. या न्यू ऑर्लिन्स शहराच्या थोड्या उत्तरेला असलेल्या स्थानापर्यंत मिसिसिपी नदी या शीत कालात गोठली होती. जर ‘ काटला ‘ ज्व्वालामुखीचा परत उद्रेक झाला तर जगाला फार मोठ्या प्रमाणात हवामानातले बदल सहन करावे लागतील यात शंकाच नाही.

. इतिहास माहिती
नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.
सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.
सर्वात नुकताच झालेला असा सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

इ. स. २०१० मधली खऱ्या अर्थानं ‘अर्थ श्ॉटरिंग’ म्हणजे पृथ्वीभेदक घटना म्हणजे आईसलँडमधील ज्वालामुखीचा उद्रेक! ज्वालामुखी मानवजातीला नवे नाहीत. पुराणकथांमधून ज्वालामुखींबद्दल बऱ्याच आख्यायिका वाचायला मिळतात. ग्रीक पुराणांमध्ये ‘हीफेस्टॉस’ या अग्निदेवाचा उद्योग म्हणजे देवांची हत्यारे बनविणे हा होता. त्याच्या ऐरणीवर घणानं ठोकून तोही हत्यारं बनवत असे. त्यातून ज्या ठिणग्या उडत आणि त्याच्या भट्टीतून जो धूर निघे, तो म्हणजे ज्वालामुखी! रोमनांचा असा देव म्हणजे ‘व्हल्कन’. त्यावरून ‘व्होल्कॅनो’ हा शब्द तयार झाला. पूर्वी हीफेस्टॉसच्या उद्योगामुळे अेटना या ज्वालामुखीचा उद्रेक व्हायचा. त्यानंतर अेओलिअन बेटांमधल्या ‘व्हुल्कानो’ बेटाचा नाश एका ज्वालामुखीच्या उद्रेकात झाल्यानंतर ज्वालामुखींना ‘व्होल्कॅनो’ हे नाव मिळालं. संस्कृतमध्ये ‘ज्वालामुखी’ हा शब्द आहे, पण भारतात तरी गेल्या पाच हजार वर्षांत ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे पुरावे नाहीत.  हिफेस्टॉसच्या हाताखाली जे मजूर काम करीत त्यांना सायक्लॉप्स असं म्हणण्यात येत असे. यांना कपाळाच्या मध्यभागी एकच एक डोळा असे. बऱ्याच तज्ज्ञांच्या मते अेटनाच्या विवराचं हे प्रतीक पुराणात सायक्लॉप्सच्या डोळ्याच्या रूपानं शिरलं असावं.पॅसिफिक महासागरामध्ये इतरत्र कुठेही आढळत नाहीत एवढय़ा संख्येनं ज्वालामुखी आहेत. काही तळाला आहेत, काही या सागराच्या कडांना आहेत. जपानमधले सर्वच ज्वालामुखी पवित्र मानले जातात. त्यांच्या उतारांवर असंख्य देवालये आढळतात. यातला सर्वात प्रसिद्ध ज्वालामुखी म्हणजे फुजियामा! हे सूर्य-साम्राज्याचं केंद्र मानलं जातं. पेरूमध्ये मिस्टी नावाचा एक दुरात्मा ज्वालामुखीच्या रूपात प्रकटतो असं मानलं जातं.

पर्मिअन एक्स्टींशन
सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास फार अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रे (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रे मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.
ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.

द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

जिवंत ज्वालामुखी
जिवंत ज्वालामुखी  एटना  - जगात असे बरेच जिवंत ज्वालामुखी आहेत. इटलीमध्ये एटना (Mount Etna) पर्वतावरचा ज्वालामुखी ३००० (तीन हजार) वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत आहे. स्त्रोम्बोली (Stromboli) नावाचा दुसरा जिवंत ज्वालामुखी पण इटलीमध्येच आहे. व्हॅन्वाटू बेटावरचे (Vanautu) दोन ज्वालामुखी गेली ८०० वर्षांपासून जिवंत आहेत आणि त्यांचे सतत स्फोटही होत आहेत.
हवाई बेटावरचा किलावेया (Kilauea) ज्वालामुखी त्याच्या वाहत्या लाव्हासाठी (जो समुद्रात जाऊन मिळतो आणि सतत तिथल्या भूभागामध्ये भर घालतो) प्रसिद्ध आहे.
अजूनही बरेच आहेत. थोडा शोध घेतल्यास कळेलच. चित्रातला ज्वालामुखी हा काँगोमधला १८८२ पासून जिवंत असलेला निअरागाँगो नावाचा ज्वालामुखी आहे. २००२ मध्ये याच्या स्फोटामुळे जवळच्या शहरांतून ४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं होतं आणि बरेच लोक विषारी वायूंमुळे मेले होते.
इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.

एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.
30 ऑगस्ट 2010

ज्वालामुखी राख -
ज्वालामुखीच्या राखेमधून तयार झालेल्या ढगामुळे आज लंडन विमानतळावरील अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आयर्लंडचा दौरा अर्धवट सोडून परतावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी राखेच्या ढगामुळे युरोपमध्ये शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती. याही वेळी उड्डाणे रद्द करावी लागतील अशी शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ज्वालामुखीच्या राखेच्या ढगामुळे (ग्रिम्सवोन) या आठवड्यामध्ये आयर्लंड आणि ब्रिटनच्या इतर भागांमधील विमान वाहतुकीवर परिणाम होईल, असे ब्रिटिश नागरी उड्डयन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. युरोपच्या इतर भागांवर या ढगाचा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

युरोपीयन एअर ट्राफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५२ उड्डाण रद्द करण्यात आली आहे.

ग्रिम्स्वोट ज्वालामुखी  - युरोपात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पुन्हा एकदा विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रिम्स्वोट नावाच्या ज्वालामुखीमुळे ब्रिटिश एअरवेजच्या ५०० विमानांना उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या युरोपा दौ-यालाही त्याचा फटका बसला आहे.
ज्वालामुखीच्या उदेकामुळे परिसरात राखेचे लोट उडाले आहेत. परिणामी विमानांना उड्डाणे करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने ५०० विमानोड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे युरोकंट्रोलतफेर् स्पष्ट करण्यात आले. उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड आणि स्कँडिनेव्हियाच्या काही भागांतील ५०० व्यावसायिक उड्डाणे रद्द करावी लागतील, असेही सांगण्यात आले. युरोपात दररोज किमान ३० हजार विमानफेऱ्या होतात. त्यामुळे ज्वालामुखीच्या उदेकाचा या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गेल्या वषीर्ही अशाच ज्वालामुखीमुळे सुमारे महिनाभर युरोपातील विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

नरसाळयाच्या आकाराचा खळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. या खळग्याला ज्वालाकुंड म्हणतात. जपानमधील फयुजियामा, इटलीतील व्हेसूव्हियस, इक्केडॉरमधील कोरोपॅक्सी ही ज्वालामुखीची उदाहरणे होत. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांच्या पूर्वेकडील बॅरन बेट हे ज्वालामुखीच्या टेकडीचे उदाहरण आहे. उद्रेकांच्या पुनरावृत्तीवरनुसार ज्वालामुखीचे जागृत. निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते.
पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील शीलारस-मॅग्मा-बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायूलोट आणि राखे सदृश्य असे खडकाचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो त्याला ज्वालामूखी हे नाव देतात.
ज्वालामूखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट धूरासारखे दिसणारे खडकांच्या सुक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वावरुन ही एक पेटलेली निर्सर्गाची भटटी आहे असे वाटणे साहजिक होते. त्यामूळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या खडकांच्या लहान मोठया कणांनाही राख अंगार-निखारे-अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक क्रियेत घडून येत नसते कचित बाहेर पडणार्‍या वायूपैकि गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.
जमिनीवर येण्यापूर्वी भुष्ठभागावर आला कि, त्यात विरघळलेले बहूतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडु लागतात ज्या शिलारसातून बहूतेक वायू निघुन गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.
मध्यवर्ती निर्सग द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामूखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालच्या शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुूळे बाजुच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकुच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो.


आइसलँडमध्ये आठवडय़ापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने युरोपची विमानवाहतूक आठवडय़ासाठी ठप्प केली. ज्वालामुखींच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास हा उद्रेक अगदीच किरकोळ ठरेल, कारण प्राचीन काळातील उद्रेकांनी पृथ्वीच्या हवामानात मोठय़ा प्रमाणावर बदल घडवून आणले आणि ते हिमयुग अवतरण्यासही कारणीभूत ठरले. आदीमानवाच्या विकासाच्या टप्प्यातही या उद्रेकांनी मोठा प्रभाव टाकला. विशेष म्हणजे हजारो किलोमीटर अंतरावर झालेल्या या उद्रेकांच्या खाणाखुणा राखेच्या रूपात भारतात आणि महाराष्ट्रात आजही जतन झाल्या आहेत! निसर्गाच्या स्वभावाची नेमकी व्याख्या करणे हे अत्यंत कठीण काम! कारण निसर्ग म्हणजे एकाच वेळी सर्वात नियमित आणि तितकाच अनिश्चित. म्हणून तर ग्रहगोलांचे फिरणे, एकापाठोपाठ येणार्‍या ऋतूंमधील नियमितता थक्क करते. पण त्याच वेळेस चक्रीवादळं, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक आणि उल्का-अशनींचे आघात हे अनिश्चिततेचे दर्शन घडवतात. किनारी प्रदेशात धडकणारी चक्रीवादळे आणि भूकंपांच्या विध्वंसातून निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळते. गेल्याच आठवडय़ात आइसलँडमध्ये उद्रेक झालेल्या ज्वालामुखीने निसर्गाच्या आणखी एका रूपाचे दर्शन घडविले. प्रचंड उद्रेकामुळे ज्वालामुखीच्या विवरातून हजारो टन राख बाहेर फेकली गेली आणि तिने आइसलँडवरचा आसमंत व्यापलाच, शिवाय ती वार्‍यावाटे शेकडो किलोमीटर अंतरावर पसरली. या उद्रेकामुळे शेकडो किलोमीटर अंतरावरील युरोप व कॅनडामधील विमानवाहतूक ठप्प झाली आणि विमान कंपन्यांना रोजचे एक हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान सोसावे लागले; जागोजागी अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले ते वेगळेच. इतकेच नाही तर खुद्द आइसलँडमध्ये आरोग्याची चिंता उभी राहिली आहे. माणसांसाठी काळजी घेणे शक्य आहे, पण जनावरांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. कारण वातावरणात फेकल्या गेलेल्या आणि आता हळूहळू वरून बरसणार्‍या ज्वालामुखीच्या राखेमुळे अनेक समस्या येऊ घातल्या आहेत. या राखेत असलेले फ्लोराईड व इतर घटकांमुळे जनावरे मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक समस्या आज त्या देशाला आणि परिसरातील देशांना भेडसावत आहेत. एरवी पोषक व पूरक समजल्या जाणार्‍या निसर्गाचेच हे एक रूप!
ज्वालामुखींच्या उद्रेकांचा इतिहास
आइसलँडमध्ये पाहायला मिळाली ती या रूपाची केवळ एक झलक आहे. कारण पृथ्वीचा इतिहास असा असंख्य अचाट व विध्वंसक घटनांनी भरलेला आहे. त्यांनी वेळोवेळी अनिश्चिततेचे दर्शन घडविलेसुद्धा आहे. युरोपातील अनेक देशांना जेरीस आणणारा आइसलँडचा आताचा उद्रेक अगदी किरकोळ ठरावा अशा भयंकर घटनांनी पृथ्वीला हादरवले आहे. त्याचे पुरावे आजही आपल्याच आसपास पाहायला मिळतात. अगदी आपल्या भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा! विशेष म्हणजे याच घटनांनी माणसाचा इतिहास घडवला आहे, माणसाच्या विकसित होण्यावर आपला प्रभाव टाकला आहे. त्याचा शोध घ्यायला लांब कुठे जायची आवश्यकता नाही. अगदी पुणे जिल्ह्य़ात बारामतीजवळ मोरगाव, नारायणगावजवळ बोरी किंवा विदर्भात पूर्णा खोर्‍यात अंदोरा, गांधीग्राम, कपिलेश्वर तसेच, वर्धा खोर्‍यातही अशा ठिकाणी या इतिहासाचे स्पष्ट पुरावे आजही अस्तित्वात आहेत. इंडोनेशियातील टोबा ज्वालामुखीच्या प्राचीन काळी झालेल्या उद्रेकांचेच हे पुरावे! या ज्वालामुखीच्या विध्वंसक उद्रेकामुळे प्रचंड प्रमाणावर राख बाहेर फेकली गेली. ती इंडोनेशियाच्या आसपास तर बरसलीच, शिवाय कित्येक किलोमीटर उंचावर जाऊन भारतीय उपखंडात परसली. संपूर्ण भारतीय उपखंड, हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि चीनच्या समुद्रातही जमा झाली. माणसाचा विकास होत असताना अलीकडच्या काळात घडलेली ही सर्वात विध्वंसक आणि पृथ्वीवर परिणाम करणारी घटना. टोबा ज्वालामुखीचे उद्रेक हे खरंतर कमालीचे थरारक व चित्तवेधक प्रकरण! कारण या ज्वालामुखीने वेगवेगळ्या कालखंडात आग ओकली आणि आपला प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर दाखवून दिला. इतका, की ग्लोबल वॉर्मिग थांबविणे हा जणू या ज्वालामुखीचा ‘बाये हाथ का खेल!’ कारण गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान जितके वाढले (सुमारे पाऊण अंश सेल्सिअस) त्याच्या कितीतरी पट तापमान कमी करण्याची क्षमता या ज्वालामुखीच्या एका उद्रेकात आहे. त्याचा अनुभव पृथ्वीने वेळोवेळी घेतलासुद्धा आहे. त्याच्या ज्ञात इतिहासानुसार गेल्या १२ लाख वर्षांमध्ये त्याने चार प्रचंड उद्रेक पाहिले आहेत आणि प्रत्येक उद्रेकाने पृथ्वीच्या हवामानात (पर्यायाने जीवसृष्टीतही!) मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या प्रकरणाचा अभ्यास कित्येक दशकांपासून सुरू आहे आणि त्याद्वारे नवनव्या रहस्यांचा उलगडासुद्धा होत आहे. पण त्याआधी अलीकडच्या काळात इतरही काही उद्रेकांनी पृथ्वीवर टाकलेल्या प्रभावाची माहिती घ्यावी लागेल. तो धागा धरून भूतकाळात डोकावणे हे हा संपूर्ण इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने अधिक संयुक्तिक ठरेल. ज्वालामुखी, भूकंप या आपल्यासाठी आपत्ती असल्या, तरी पृथ्वी जिवंत असल्याचे ते पुरावेच. तिच्या अंतरंगात साठलेली प्रचंड ऊर्जा या घटनांद्वारे बाहेर पडते. पृथ्वीवर विशिष्ट पट्टय़ात ज्वालामुखी व भूकंपांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते. त्यात सर्वात सक्रिय पट्टा म्हणजे प्रशांत महासागराला वेढणारा गोल पट्टा! तिथे जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी असल्याने तो ‘रिंग ऑफ फायर’ या नावानेही ओळखला जातो. पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात सर्वात घातक ज्वालामुखींना जन्म देणारे इंडोनेशिया, मलेशिया हे देशही याच ‘रिंग ऑफ फायर’वर आहेत. याशिवाय दुसरा सक्रिय पट्टा म्हणजे अटलांटिक महासागराच्या मधोमध असलेला ‘मिड अटलांटिक किंवा मिड ओशियानिक बेल्ट’! गेल्या आठवडय़ात बरसलेला आइसलँडमधील ज्वालामुखी या पट्टय़ात मोडतो. तिसरा पट्टा आहे, ‘अल्पाईन-हिमालयन बेल्ट’; हिमालयापासून युरोपातील आल्प्स पर्वतापर्यंत पसरलेला! इटलीमधील माउंट वेसुवियस यांसारखे प्रसिद्ध ज्वालामुखी या पट्टय़ात मोडतात. हेच पट्टे सक्रिय असण्याचे कारण म्हणजे हे पट्टे पृथ्वीच्या कवचाच्या विविध प्लेट्सच्या सीमारेषांवर आहेत. या प्लेट्सची सतत हालचाल होत असते, त्यामुळे अधिकाधिक ऊर्जा येथूनच बाहेर पडते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय बाहेर पडते, त्यावर त्याचे स्वरूप ठरते. त्यातून प्रवाही लाव्हारस बाहेर पडतो, त्याचप्रमाणे खडकाच्या मोठाल्या शिळा तसेच वेगवेगळ्या आकाराची राखसुद्धा बाहेर पडते. राख सूक्ष्म आकाराची असेल तर ती कितीतरी किलोमीटर (अगदी १० किलोमीटरपासून ते ३० किलोमीटपर्यंत) उंचावर फेकली जाते आणि उंचावरील वार्‍यांच्या प्रवाहासोबत ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून दूरवरच्या प्रदेशात कुठेतरी जमा होते.
तंबोरा, पिनाटुबो आणि क्रोकाटोआ

टोबाच्या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी अलीकडच्या काळातील प्रचंड अशा तंबोरा, पिनाटुबो, क्रोकाटोआ या ज्वालामुखींच्या उद्रेकाची दखल घ्यावी लागेल. कारण त्यांनीसुद्धा पृथ्वीचे वातावरण व हवामानावर मोठा प्रभाव टाकला आहे. या उद्रेकांमधून जितकी जास्त प्रमाणात राख बाहेर पडेल आणि ती जितक्या जास्त अंतरावर पसरली जाईल, तितका जास्त प्रभाव जागतिक हवामानावर पडतो. कारण ही राख वातावरणात पसरते, तेव्हा पृथ्वीवर येणार्‍या सूर्याच्या किरणांना रोखते. त्यामुळे जागतिक तापमान कमी होते. याशिवाय उद्रेकातून बाहेर पडणार्‍या सल्फर डायऑक्साईड वायूमुळेसुद्धा तापमान कमी होण्यास मदत होते. फिलिपिन्समधील लूझॉन बेटावरील ‘माऊंट पिनाटुबो’ ज्वालामुखीचा अलीकडे म्हणजे १९९१ साली उद्रेक झाला. त्यातून तब्बल १० घनकिलोमीटर इतकी राख बाहेर पडली. त्याचा परिणाम असा झाला, की आताच्या जागतिक तापमानवाढीच्या युगातही वातावरणाचे तापमान काही काळासाठी तब्बल ०.४ ते ०.५ अंश सेल्सिअसने कमी झाले. त्यापूर्वी १८८३ साली इंडोनेशियातील क्रोकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक त्याहून भयंकर होता. इतका भयंकर की हे बेटच कायमचे कोलमडून पडले. या बेटाचे क्षेत्रफळ साधारणत: २३ चौरस किलोमीटर होते. त्यापैकी दोन-तृतीयांश बेट या उद्रेकात पूर्ण उडाले. आणि त्याचे रूपांतर तब्बल सहा किलोमीटर व्यासाच्या विवरात झाले. त्याच्या प्रचंड हादर्‍यामुळे तब्बल साडेचार हजार किलोमीटरवरची जमीनही हादरली होती. या विध्वंसाबरोबरच तप्त राख व विषारी वायूंचा परिणाम म्हणून बेटावरील हजारो लोक मृत्युमुखी पडलेच, शिवाय त्याचा प्रभाव हवामानातील बदलांच्या रूपात जगभर पाहायला मिळाला. या दोन प्रचंड उद्रेकांनाही लहान ठरविणारा उद्रेक १८१५ साली इंडोनेशियामध्ये झाला. तो होता तंबोरा ज्वालामुखीचा. या उद्रेकात तब्बल ५० घनकिलोमीटर इतकी प्रचंड प्रमाणात राख बाहेर पडली. त्यापैकी काही राख उद्रेकानंतर लगेचच या चार किलोमीटर उंचीच्या ज्वालामुखीवरून वेगाने खाली उतरली. त्या तप्त राखेत दहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील हवामानावर सर्वात मोठा परिणाम करणारा हा उद्रेक ठरला, कारण त्यातून बाहेर पडलेल्या राखेमुळे जागतिक तापमान तब्बल ०.४ ते ०.७ अंश सेल्सिअसने कमी झालेच पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे या उद्रेकानंतरच्या वर्षी उत्तर गोलार्धातील बर्‍याचशा प्रदेशात (अमेरिका व युरोपसह) उन्हाळा पडलाच नाही. ते वर्ष उन्हाळ्याविनाच गेले. या उद्रेकांची आणि त्यांच्या प्रचंड स्वरूपाची ओळख करून घेतल्यावर आता टोबाच्या उद्रेकांची माहिती पचविणे सोपे जाईल. कारण आतापर्यंत वाचलेले वर्णन अगदीच फिके ठरावे असाच टोबाचा इतिहास आहे. माऊंट टोबा हासुद्धा इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील ज्वालामुखी; बराच काळ निद्रिस्त अवस्थेत असणारा, पण जागा झाला की संपूर्ण पृथ्वीवर आपली छाप सोडणारा! कारण आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासात टोबाचे एकूण चार प्रचंड उद्रेक झाले आहेत. त्या सर्वच्या सर्व उद्रेकांच्या खाणाखुणा आजही जागोजागी अस्तित्वात आहेत; केवळ इंडोनेशिया किंवा जवळच्या परिसरात नव्हे, तर त्या जगभर विखुरलेल्या आहेत. त्याच्या खुणा म्हणजे त्यातून बाहेर पडलेली प्रचंड प्रमाणातील राख ठिकठिकाणी साठून राहिली आहे. त्याच्या चार प्रमुख उद्रेकांपैकी सर्वात जुना म्हणजे- १२ लाख वर्षांपूर्वीचा. त्यापाठोपाठ आठ लाख, पाच लाख आणि सर्वात अलीकडचा ७४ हजार इतक्या वर्षांपूर्वी त्याचे उद्रेक झाले. या उद्रेकांचे प्रमाण कमालीचे प्रचंड असल्याने हवामानावर त्याचा प्रचंड परिणाम झालाच, शिवाय हा काळ अर्वाचीन माणसाच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्यावरही या बदलांचा खूप मोठा परिणाम झाला. इतका की काही तज्ज्ञांच्या मते तर सर्वात अलीकडच्या काळातील म्हणजे ७४ हजार वर्षांपूर्वीच्या उद्रेकामुळे झालेल्या बदलांमुळे संपूर्ण माणूस जात नष्ट होण्याच्या मार्गावर होती. याबाबत अनेक अभ्यासकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मात्र, त्या उद्रेकाचे प्रचंड स्वरूप तसेच, त्याचे हवामानावर आणि माणसावर झालेले परिणाम याबाबत कोणाचेही दुमत नाही.
टोबाची महाआपत्ती
‘टोबा महाआपत्ती सिद्धांता’नुसार साधारणत: ७४ हजार वर्षांपूर्वी झालेला टोबाचा उद्रेक हा पृथ्वीवरील आतापर्यंतच्या माहीत असलेल्या उद्रेकांपैकी सर्वात भीषण मानला जातो. हा एक ज्वालामुखी नव्हता, तर ते अनेक ज्वालामुखींचे सुमारे १०० किलोमीटर बाय ३५ किलोमीटर आकाराचे विस्तृत असे केंद्र असल्याचे समजले जाते. त्यातून तब्बल २००० ते ३००० घन किलोमीटर इतक्या प्रचंड प्रमाणातून लाव्हारस, खडक, राख, अनेक वायू असे पदार्थ बाहेर पडले. त्यापैकी राखेचे व वायूंचे प्रमाण तब्बल ८०० ते १००० घन किलोमीटर इतके होते. अलीकडच्या काळातील तंबोरा ज्वालामुखीच्या उद्रेकाशी तुलना केली, तर ही राख १६ ते २० पटीने जास्त होती. तंबोरामुळे एक वर्ष उन्हाळा पडला नाही, तर टोबामुळे काय झाले असेल? टोबामुळे तेच घडले- या उद्रेकामुळे पृथ्वीभोवती जणू या राखेचे आवरणच निर्माण झाले होते. त्यामुळे सूर्यप्रकाश अडून जगभर सलग सहा ते दहा वर्षे हिवाळाच अनुभवायला मिळाला. एवढय़ावर भागले नाही, तर त्यानंतरच्या एक हजार वर्षांहून अधिक काळासाठी पृथ्वीवर छोटे हिमयुग अवतरले होते. काहींच्या मते वातावरणाचे तापमान तीन-साडेतीन अंशांनी कमी झाले होते. जगाचे तापमान एका झटक्यात इतके कमी होणे ही अनोखी आणि अपवादात्मकच घटना! काही अभ्यासकांच्या मते तर तापमानातील घट तब्बल १५ अंश इतकी जास्त होती. या सर्व घडामोडींचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर झाला तसाच तो माणसाच्या पूर्वजांवरही झाला. या काळात माणसाची लोकसंख्या इतकी कमी झाली की मनुष्य जात नष्ट होण्याच्या काठावर येऊन पोहोचली होती. त्या वेळी जगातील माणसांची संख्या केवळ १० हजारांच्या आसपास उरली होती आणि प्रजननक्षम जोडप्यांची संख्या तर एक हजारापर्यंत झाली आली होती, असे काही अभ्यासक मानतात. माणसाच्या इतिहासात हा काळ ‘पॉप्युलेशन बॉटलनेक’ म्हणून ओळखला जातो. (अर्थात, याबाबत सर्व अभ्यासकांचे एकमत नाही.) या आपत्तीतून तावून-सुलाखून निघाल्यावर मात्र पुढच्या काळात माणसांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. टोबाच्या उद्रेकाचा परिणाम म्हणून माणसाच्या पूर्वजांमध्ये असलेली वांशिक विविधता नष्ट झाल्याचेही काही तज्ज्ञ मानतात. या उद्रेकात असे काही गट नामशेष झाल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. पण या सिद्धांताबाबतही अभ्यासकांचे एकमत नाही. टोबाच्या उद्रेकाचा सर्वाधिक प्रभाव आशिया खंडात, मुख्यत: भारतीय उपखंडात पडल्याचे मानले जाते. त्यातून बाहेर पडलेल्या राखेचे सुमारे अर्धा-अर्धा फूट जाडीचे थर आजही भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी तसेच, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, चीनचा समुद्र येथे ठळकपणे पाहायला मिळतात.
टोबा आणि भारत
याचा अर्थ काही अभ्यासकांनी असा लावला, की या काळात भारतीय उपखंडातील व एकूणच या भागातील माणसाचा वंश नष्ट झाला आणि त्यानंतर तो हिमयुगाच्या काळात (विशेषत: आफ्रिका-युरोपमार्गे) ठिकठिकाणी पोहोचला. बर्‍याच पाश्चात्त्य अभ्यासकांनी हा सिद्धांत उचलून धरला होता. त्यामुळे टोबा हा विषय केवळ भूशास्त्र-पर्यावरण यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो विविध प्रदेशांच्या अस्मितांच्या दृष्टीनेही अभ्यासाचा भाग बनला आहे. अलीकडच्या काळातील टोबाच्या अभ्यासावरून मात्र हा पाश्चात्त्यांचा सिद्धांत टिकणारा नसल्याचे दिसून आले. हा निव्वळ खोडसाळपणा आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेला फार्स असल्याचे अनेक भारतीय तज्ज्ञ सांगतात. कारण या म्हणण्याला पुरावेच नव्हते, तरीही तो पुढे रेटण्यात आला होता. आता हेच तज्ज्ञ आपला सिद्धांत खोटा असल्याचे सांगून पुन्हा प्रसिद्धी मिळवत आहेत. टोबासारख्या उद्रेकांचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे आदीमानवाशी संबंधित अनेक पुरातत्त्वीय ठिकाणांचा काळ ठरविणे शक्य झाले आहे. एकतर ज्वालामुखीची राख जमा झाल्याने ही ठिकाणे व तेथील साहित्य त्या राखेखाली आहे तसे टिकून राहते. शिवाय किरणोत्सारी पद्धत वापरून राखेचा कालखंड काढता येतो त्यामुळे आदीमानवाशी संबंधित असलेल्या त्या ठिकाणांचाही काळ सांगता येतो. त्यामुळेच केवळ भूशास्त्रज्ञांच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुरातत्त्वाच्या अभ्यासकांसाठीसुद्धा टोबा किंवा असे ज्वालामुखीचे उद्रेक तितकेच उपयुक्त ठरत आहेत. भारतातही महाराष्ट्र, मध्य भारत व दक्षिण भारतात अनेक ठिकाणी अशी राख व आदीमानवाशी संबंधित ठिकाणे आढळतात. पुण्यातील डेक्कन कॉलेज किंवा इतर संशोधक संस्थांकडून त्याचा अभ्यास सुरू आहे. भारतात महाराष्ट्रातील बोरी, मोरगाव तसेच आंध्र प्रदेशातील ज्वालापूरम या ठिकाणच्या अभ्यासात आढळलेली एक बाब म्हणजे- या राखेच्या थराखाली व वरसुद्धा आदीमानवाची एकाच प्रकारची हत्यारे मिळाली आहेत. याचा अर्थ ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आघाताचा माणसावर परिणाम झाला असला, तरी या धक्क्य़ातून येथे तरी तो सावरला असल्याचे पाहायला मिळते. डेक्कन कॉलेजचा अभ्यासही त्याला दुजोरा देतो. केंब्रिज विद्यापीठातर्फे आधी वेगळाच सिद्धांत मांडला जात होता- टोबाच्या उद्रेकामुळे भारतातील माणूस नष्ट झाल्यामुळे त्यानंतर बाहेरून माणूस येथे स्थलांतरित झाला. पण अलीकडे भारतातील टोबाच्या राखेचा व पुरातत्त्वीय ठिकाणांच्या अभ्यासावरून हे तज्ज्ञसुद्धा, असे स्थलांतरण झाले नसल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत. याबाबत वेगवेगळ्या अभ्यासकांचे वेगवेगळे सिद्धांत असले, तरी टोबाच्या उद्रेकांनी जगात उलथापालथ केल्याचे सर्व जण मान्य करतात. टोबा व एकूणच ज्वालामुखींच्या उद्रेकांचा विचार करता भविष्यात त्यांच्याकडून कोणती उलथापालथ घडवून आणली जाईल, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. मात्र, असे उद्रेक होत राहणार, हे निश्चित! हे कधी घडणार हाच कळीचा प्रश्न आहे. या प्रचंड उद्रेकांच्या राखेमुळे भविष्यात वातावरणाचे तापमान कमी होऊन कदाचित काही काळासाठी ग्लोबल वॉर्मिगला आळा बसेल. पण असे उद्रेक माणसाच्या विकासावर व प्रगतीवर परिणाम करतील की आणखी काही परिणाम घडवून आणतील हे येणारा काळच सांगेल. टोबाच्या उद्रेकांनी भूतकाळातील अनेक रहस्ये उलगडून दाखवली आहेत. त्याचबरोबर निसर्गाच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवून निसर्गाबद्दलच्या आपल्या गोंडस कल्पनांना छेदही दिला आहे. त्यामुळे पचायला कितीही जड असले, तरी निसर्गातील नियमिततेबरोबरच त्याच्या अनिश्चिततेचे वास्तवसुद्धा स्वीकारावेच लागेल. नाहीतर आपल्याला संपूर्ण निसर्ग समजला असे म्हणता येणार नाही. निसर्गात सर्व काही चांगलेच घडते असे नाही. तर अनिश्चितता, विध्वंस, रौद्रता हेसुद्धा त्याचे अविभाज्य भाग आहेत. त्यावर मात करून टिकून राहणे हेच काय ते आपल्याला करावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील राखेचे गूढ

महाराष्ट्रात मोरगाव व बोरी येथे आढळणार्‍या टोबाच्या राखेच्या काळाबाबत गूढ कायम आहे. सर्वसाधारणपणे अभ्यासक या राखेचा संबंध टोबा ज्वालामुखीच्या सर्वात अलीकडच्या (७४ हजार वर्षांपूर्वीच्या) उद्रेकाशी जोडतात. मात्र, पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या डॉ. शीला मिश्रा व त्यांच्या सहकार्‍यांनी प्राचीन चुंबकत्वाचे तत्त्व आणि पुरातत्त्वीय हत्यारांचा अभ्यास केला आहे, त्यावरून या राखेचा काळ बराच मागे जातो. बोरी येथील राखेचा काळ आठ लाख वर्षांच्या मागे जातो, तर मोरगाव येथील राखेचा काळ १२ लाख वर्षांचा असल्याचे त्यावरून दिसते. मात्र, इतर आणखी पुरावे तपासून हा काळ निश्चित करावा लागेल, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment