Wikipedia

Search results

Thursday 16 May 2013

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर
पूर्ण नाव     मंगेश केशव पाडगावकर
जन्म     नोव्हेंबर १०, १९२९
वेंगुर्ला,सिंधुदुर्ग
कार्यक्षेत्र     साहित्य, संगीत, दूरचित्रवाणी
राष्ट्रीयत्व     भारतीय Flag of India.svg
पुरस्कार     महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी पुरस्कार १९८०
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, २०१०
वडील     केशव पाडगावकर
पत्नी     पाडगावकर
 लेखन
 * धारानृत्य (१९५०)  * सलाम (१९८०)
    * त्रिवेणी (१९९५)  * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद
    * उदासबोध (१९९६)   * मोरू (१९९९)   * सुरदास (१९९९)
      * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद    * राधा (२०००)
    * शर्मिष्ठा (१९६०)  * वादळ * सूर आनंदघन * कबीर १९९७ कबीराच्या दोह्यांचा अनुवाद
    * गिरकी  * चोरी   * भटके पक्षी (१९८४)    * जिप्सी (१९९४)
    * उत्सव (१९६२)    * मुखवटे   * नवा दिवस (१९९३)
    * काव्यदर्शन (१९६२)      * तुझे गीत गाण्यासाठी (१९८९)
    * तृणपर्णे     * गझल (१९८१)   * सुट्टी एक्के सुट्टी (१९९३)
    * उदासबोध (१९९६) * वात्रटिका (१९९९)   * कविता माणसाच्या माणसासाठी (१९९९)
    पाडगावकरांच्या काही प्रसिद्ध कविता
        * अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी   
    * फिदी फिदी हसतील ते?   * फ़ूल ठेवुनी गेले 
    * दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
    * आम्‍लेट   * मी बोलले न काही नुसतेच पाहिले
    * जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा  * सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
        * सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला   * सलाम   
 गौरव
     * अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, २०१०
 पुरस्कार
    * साहित्य अकादमी पुरस्कार १९८० सलाम
    * महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००


पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.
    पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.
    कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.
    पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.
    पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.
    तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.
    तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम".

''पद्म पुरस्कार मिळण्याबाबत मी व्यक्त केलेल्या मनोगतावर कवी ना. धों. महानोर यांनी "सकाळ'मध्ये केलेले भाष्य वाचून मी निरुत्तर झालो आहे. त्यांनी जे काही लिहिले, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा, माझ्यावर, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच बोलणे योग्य ठरेल,'' अशी भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
    संगमनेर येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात पाडगावकर यांनी भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेची निस्सीम सेवा करूनही अद्याप शासनाने दखल न घेतल्याची बोचही पाडगावकरांनी या वेळी बोलून दाखवली होती. हे पुरस्कार कसे मिळतात, हेदेखील आपल्याला माहीत असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले होते.
    पाडगावकर यांनी पद्म पुरस्कारांबाबत व्यक्त केलेल्या मनोगतावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा महानोर यांचा लेख "लाचावले मन, लागलीसे गोडी' या शीर्षकाखाली आज (ता. 4) "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रतिप्रश्‍न पाडगावकरांनी केला आहे.

No comments:

Post a Comment