Wikipedia

Search results

Saturday 9 November 2013

स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स

(इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा पूर्वी पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ऍपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ऍपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ऍपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ऍपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ].
स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.

 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश.
 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश..हाच त्याच्या जगण्याचा मंत्र ..अवघ्या 56 वर्षाच्या आयुष्यात स्टीव नेहमी भूकेला राहिला त्यामुळेच तो यशाची शिखरं चढत राहिला. त्याला वेड होतं कामाचं, नाविन्याच्या शोधाचं...

एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या पोटी स्टीवचा जन्म झाला. म्हणजे स्टीव हे लग्नाशिवाय झालेलं अपत्य.  त्याला दत्तक देण्याचा निर्णय त्याच्या आईनं घेतला पण एका अटीसहीत. दत्तक आईवडील हे ग्रॅज्युएट असावेत. .पण तसं झालं नाही...ज्यांनी स्टीवला दत्तक घेतलं त्यांनी स्टीवच्या आईला वचन दिलं की एके दिवशी स्टीव नक्कीच कॉलेजमध्ये शिकायला जाईल...आणि गेलाही.

स्टीव १७ वर्षाचा असताना रीड कॉलेजात दाखल झाला..पण त्याचं मन काही तिथं रमेना. अवघ्या सहा महिन्यात तिथून तो बाहेर पडला. फार पैसा नसताना स्टीवनं केलेलं धाडस रस्त्यावर आणणारं होतं. झालयही तसच. संध्याकाळच्या एका जेवणासाठी स्टीवला काही मैलाची पायपीट करत हरे कृष्णा मंदीर गाठावं लागायचं. पण कॅलीग्राफीमध्ये स्टीव माहीर होता. मग काय स्टीवनं घराच्या गॅरेजमध्येच अॅपल कंपनी सुरु केली. सोबत होता मित्र वॉझ.दहा वर्षात अॅपलनं पहिला मॅकिन्टोश कंप्युटर जगाला दिला..त्यातील टायपोग्राफी ही स्टीवच्या कॅलिग्राफीची कमाल होती. वयाच्या तिशीत स्टीव दोन बिलियन डॉलर उलाढाल असलेल्या आणि चार हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचा मालक बनला
 पण स्टीवचा संघर्ष इथंच संपला नाही..वयाच्या तिशीत ज्या कंपनीची स्थापना  केली त्या अॅपलमधूनच स्टीवला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. कंपनीच्या मॅनेजमेंटशी त्याचा वाद झाला. स्टीव पुन्हा रस्त्यावर आला. परत पैशाचे वांदे झाले पण स्टीवकडं होता तो एक अफलातून मंत्री. स्टे हंग्री स्टे फुलीश.

काहीच महिन्यात स्टीवनं नेक्स्ट आणि पिक्सार या दोन नव्या कंपन्या सुरु केल्या. झपाटून कामाला सुरुवात केली...पिक्सारनं जगातील पहिली अॅनिमेटेड फिल्म तयार केली. जगातला सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ याच कंपनीकडे आहे. काहीच वर्षात अॅपलनं नेक्स्ट खरेदी केली..स्टीव पुन्हा अॅपलमध्ये परतला.

स्टीवच्या आयुष्यात शांतता कधीच नांदली नाही..२००४ मध्ये स्टीवला कॅन्सर झाला...तोही स्वादुपिंडाचा...डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्टीव थोड्याच दिवसाचा साथीदार होता..पण एके दिवशी तपासणीदरम्यान अतिशय दुर्मिळ असलेल्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया केल्यास तो बरा होऊ शकतो असं डॉक्टरांच्या लक्षात आलं...

स्टीववर शस्त्रक्रिया झाली..काही दिवसांच्या विश्रांतीनंतर स्टीव पुन्हा कामात मग्न झाला. अॅपल कम्युटर, मॅकिन्टोश अशा उत्पादनांनी ऍपल आता जगप्रसिद्ध होती. पण आयफोन, आयपॅड, आयपॉड अशा अनेक शोधांनी स्टीव जगभरातल्या तरूणांचा आणि उद्योजकांचा ताईत झाला. खुद्द बिल गेटसनं कितीतरी वेळेस स्टीवच्या अॅपलची उत्पादनं मायक्रोसॉप्टपेक्षा किती तरी सरस असल्याचं कबुल केलं.  पण सौंदर्याला कदाचित शाप असावा. स्टीव आता छप्पन वर्षाचा झाला. पण गेल्या वर्षभरात त्याच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. आता आपण फार काळ जगणार नाही, याची जाणीवही स्टीवला झाली असावी.

त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी त्यानं अॅपलच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण करू शकत नसल्याची खंत स्टीवनं व्यक्त केली. त्यावेळेस जग हळहळलं. अखेर काल अॅपलनं आणखी एक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आयफोन ४ एस बाजारात आणला असतानाच त्याचं निधन झालं. स्टीव आता आपल्यात नाही पण त्यानं निर्माण केलेले प्रोडक्ट जगभरातल्या लोकांच्या हातात आहेत आणि ते एकच संदेश देत राहातात..स्टे हंग्री स्टे फुलीश.


 एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचा प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव जॉब्स यांचे पदवीदान समारंभातील भाषण आहे, जून १२, २००५

 आज तुमच्याबरोबर येथे जगातील एका सर्वोत्क्रुष्ट महाविद्यालयातील तुमच्या पदवीदान समारंभाला मला अतिशय अभिमान वाटत आहे.मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण केल नाही.खरं सांगायचं तर, महाविद्यालयीन पदवीशी माझा हाच एक सर्वात जवळचा संबंध आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगयच्या आहेत. येवढंच. फार काही नाही. फक्त तीन गोष्टी.
 पहिली गोष्ट आहे ठिपके जोडण्याची.
 मी रीड महाविद्यालयातून पहिल्या ६ महिन्यांनंनर बाहेर पडलो, पण नंतर पुर्णपणे सोडण्यआधी साधारण १८ महिने मी तसाच महाविद्यालयात पडीक होतो. मग मी का सोडून गेलो?
 ह्या गोष्टीला माझ्या जन्मआधी सुरुवात झाली. माझी जन्मदात्री आई एक तरुण, कुमारिका महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक देऊन टाकायचे ठरविले. तिला असे प्रकर्षाने वाटले की मला महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांन्नी दत्तक घ्यावे, त्यामुळे या सगळ्याची एका वकिलाने आणि त्याच्या पत्नीने माझ्या जन्माच्या वेळीच तयारी केली होती. फक्त जेव्हा मी बाहेर आलो त्यान्नी आयत्या वेळी ठरवले की त्यान्ना खरेतर मुलगी हवी होती. त्यामुळे माझे आई वडील जे प्रतिक्षा यादिवर होते, त्यान्ना मध्यरात्री निरोप आला, आणि विचारलं: "आमच्याकडे अनपेक्षितपणे एक मुलगा झाला आहे; तुम्हाला तो हवा आहे का?" ते म्हाणाले: "नक्कीच". माझ्या जन्मदात्रा आईला नंतर कळाले की माझी आई कधीच महाविद्यालयात गेली नव्हती आणि माझे वडील कधीच माध्यमिक शाळेत गेले नव्हते. तिने शेवटच्या दत्तक विधानांवर सही करायला नकार दिला. थोड्या महिन्यांनी ती नरमली जेव्हा माझ्या पालकांनी वचन दिले की मी कधितरी महाविद्यालयात जाईन.
 आणि १७ वर्षांनंतर मी खरंच महाविद्यालयात गेलो. पण मी भोळसटासारखे असे महाविद्यालय निवडले जे जवळ जवळ स्टॅनफर्ड येवढेच महाग होते, आणि माझ्या मध्यमवर्गीय पालकांची सगळी बचत माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षणमुल्यावर खर्च होत होती. सहा महिन्यांनंतर, मला त्यात काही तत्थ्य दिसेना. आयुष्यात मला काय करायचे आहे याची मला काहीच कल्पना नव्हती आणि महाविद्यालयात जाण्याने ते मला कसे शोधून काढता येईल याचिही काही कल्पना नव्हती. आणि इथे तर मी माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर जमवलेले सगळे पैसे खर्च करून टाकत होतो. म्हणून मी असं ठरवलं की 'सगळं नीट होईल' असा भरवसा ठेवून शिक्षणाला रामराम ठोकायचा. त्यावेळी ते सगळंच खूप भीतिदायक वाटलं होतं, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की तो माझा सर्वात चांगला निर्णय होता. महाविद्यालय सोडल्यावर मला नीरस वाटणारे पण सक्तीचे विषय मी टाळू शकलो अाणि अावडणाऱ्या विषयांच्या तासांना बसू लागलो.
 ते सगळं काही फारसं रोमहर्षक नव्हतं. मला वसतिगृहात खोली नव्हती म्हणून मी मित्रांच्या खोल्यांमधे फरशीवर झोपायचो, कोकच्या बाटल्या परत करून त्यावरचं पाच पाच सेंटचं डिपॉझिट गोळा करून त्यातून अन्न विकत घ्यायचो आणि दर रविवारी रात्री शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हरे कृष्ण मंदीरात निदान एक तरी चांगलं जेवण मिळवण्यासाठी ७ मैल चालत जायचो. मला ते सगळं आवडीचं वाटलं. आणि माझं कुतूहल आणि अंतर्ज्ञान यांचा पाठपुरावा करून मला जे काही मिळालं ते बहुतेक सगळं पुढे अनमोल ठरलं. उदाहरणार्थ:
 त्यावेळी रीड कॉलेजातील लेखनशैलीचं शिक्षण बहुधा देशात सर्वोत्कृष्ट असावं. संपूर्ण अावारात प्रत्येक भित्तिचित्र, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हे सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं असे. मी महाविद्यालय सोडून दिले असल्याने आणि नेहेमीचे विषय घेत नसल्याने, मी लेखनशैलीचा विषय घेऊन ते शिकायचे ठरवले. मी सेरीफ आणि सान सेरीफ अक्षररचने बद्दल शिकलो, विविध अक्षरांमधील विविध अंतराच्या रचने बद्दल शिकलो, मी शिकलो कशी एक महान अक्षररचना महान होते. ते सुंदर आणि ऐतिहासिक होते, कलात्मकतेचा असा एक सुक्ष्म पैलू जो विज्ञान समजू शकत नाही, आणि तो मला आकर्षक वाटला.
 यातील कशाचाही माझ्या आयुष्यात काहीही व्यावहारीक उपयोग नव्हता.पण दहा वर्षांनी, जेव्हा आम्ही पहिल्या Macintosh व्यक्तिगत संगणकाची रचना करीत होतो, तेव्हा ते सगळे मला परत आठवले. आणि ते सगळे आम्ही Mac च्या रचनेत एकत्रित केले. सुंदर अक्षर रचना असलेला तो पहिला संगणक होता. जर मी महाविद्यालयात तो एक विषय घेतला नसता, तर Mac मधे कधीच विविध अक्षर रचना किंवा सम-अंतराची अक्षर रचना नसती. आणि Windows ने फक्त Mac ची नक्कल केली, त्यामुळे दुसरया कुठल्याही व्यक्तिगत संगणकात ती असण्याची शक्यता नाही. जर मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर मी कधीच सुलेखनाच्या तासिके मधे गेलो नसतो, आणि व्यक्तिगत संगणकात बहुतेक कधीच सुंदर अक्षर रचना आली नसती जी आत्ता आहे. खरंतर मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा भविष्यकाळात पाहुन हे ठिपके जोडणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे वळून पाहताना, हे सर्व फारच स्वच्छ दिसत होते.
 परत मुद्दा असा की, तुम्ही ठिपके पुढे भविष्यकळात पाहुन जोडू शकत नाही, तुम्ही फक्त ते मागे वाळून पाहताना जोडू शकता. म्हणून तुम्ही फक्त खात्री बाळगली पाहिजे की भविष्यकाळात हे ठिपके एका प्रकारे जोडले जातील. तुम्ही काही गोष्टिंवर विश्वास ठेवला पाहिजेत - तुमची अंतर्भावना, नशीब, जीवन, कर्म, जे काही. या द्रुष्टिकोणाने माझी कधीच निराशा केली नाहिये, आणि यानेच माझ्या जीवनात आमुलाग्र बदल केला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि नुकसाना बद्दल.
 मी नशीबवान होतो - मला ज्याची आवड होती ते मला आयुष्यात लवकर सापडले. मी जेव्हा २० वर्षांचा होतो, तेव्हा वॉझ आणि मी माझ्या आई वडिलांच्या गॅरेज मधे एप्पल चालू केली. आम्ही खुप मेहेनत केली, आणि १० वर्षांत आमच्या दोघांच्या गॅरेज मधील कामापासून एप्पल एक २ अब्ज डॉलर्स ची ४००० पेक्षा जास्त लोकांची कंपनी झाली. आम्ही आमचं सर्वोत्क्रुष्ट निर्माण - मॅकिंतोश - एका वर्षापूर्वी सुरू केलं होतं, आणि मी तेव्हाच ३० वर्षांचा झालो होतो. आणि त्यानंतर मला काढून टाकलं. तुम्ही सुरू केलेल्या कंपनी मधुन तुम्हाला कसं काढुन टाकता येईल? खरंतर, जशी एप्पल वाढली तशी आम्ही अश्या एकाला कामावर घेतलं जो, मला वाटलं, माझ्या बरोबर कंपनी चालवण्यासाठी खुप हुशार होता, आणि साधारण पहिल्या वर्षासाठी सर्व गोष्टी ठीक झाल्या. पण मग आमची भविष्याबाबतची द्रुष्टि वेगळी होऊ लागली आणि शेवटी आमच्यात वितुष्ट आले. आणि असं जेव्हा झालं, तेव्हा आमच्या संचालक मंडळाने त्याची बाजू घेलती. अश्याप्रकारे ३० व्या वर्षी मी कंपनीच्या बाहेर होतो. आणि खुपच सार्वजनिक रित्या बाहेर होतो. माझ्या संपुर्ण प्रौढ जिवनाचे जे लक्ष्य होते ते गेले होते, आणि हे सर्व विनाशक होते.
 काय करावे हे पुढचे काही महिने मला खरंच माहित नव्हते. मला असं वाटलं की मी आधिच्या पिढीच्या उद्योजकांना निराश केले होते - कारण मी माझ्याकडे सुपुर्त केलेली छडी टाकली होती. मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईस ना भेटलो आणि अश्या मोठ्या प्रकारे अपयशी ठरल्याबद्दल माफी मागितली. मी एक खुपच सार्वजनिक अपयश होतो, आणि मी तर वॅली मधून पळून जाण्याचाही विचार केला. पण काही गोष्टी हळुहळू मला लक्षात येऊ लागल्या - मला अजुनही मी जे काम केले त्याबद्दल आत्मियता होती. एप्पल मधे झालेल्या घटनांनी ती एक गोष्ट बदललेली नव्हती. मला धुडकावून लावलं होतं, पण मला अजुनही त्याबद्दल आत्मियता होती. आणि म्हणून मी परत सुरुवात करायची ठरवली.
 मला त्यावेळी ते दिसलं नाही, पण असं होतं की एप्पल मधून काढलं जाणं ही माझ्या जिवनात घडलेली एक सर्वात चांगली गोष्ट होती. नवखेपणातील हलकेपणाने यशस्वी होण्याच्या वजनदार पणाची जागा घेतली होती, सर्वच बाबतीत कमी शाश्वती. त्याने मला माझ्या जिवनातील एका सर्वात कल्पक कालावधित प्रवेश करायला मुक्त केलं होतं.
 पुढच्या पाच वर्षांत, मी नेक्स्ट कंपनी चालू केली, अजून एक पिक्सार नावाची कंपनी चालू केली, आणि मी एका वेगळ्याच स्त्रीच्या प्रेमात पडलो. पिक्सार ने जगातील पहिली संगणकीय एनिमेशन चा चित्रपट बनविला, टॉय स्टोरी, आणि ती कंपनी आता जगातील एक सर्वात यशस्वी एनिमेशन गृह आहे. काही उल्लेखनीय घटनांच्या कलाटणी मधे, एप्पल ने नेक्स्ट विकत घेतली, मी एप्पल मधे परत आलो, आणि आम्ही जे तंत्रज्ञान नेक्स्ट साठी विकसित केले होते ते आता एप्पलच्या नवनिर्मितीचा प्रमुख स्थानी आहे. आणि लॉरेन आणि माझे एक सुंदर कुटुंबं आहे.
 मला खात्री आहे की जर मी एप्पल मधून काढला गेलो नसतो तर या पैकी काहिही झाले नसते. ते एक भयानक चवीचे औषध होते, पण मला वाटतं ती रोग्याची गरज होती. कधी कधी जीवन तुमच्या डोक्यावर एखाद्या विटेने आघात करतं. विश्वास सोडू नका.हे नक्की की, जे मी करत होतो ते मला आवडत होतं आणि केवळ त्यामुळेच मी ते करत राहू शकलो.तुम्हाला जे आवङतं ते नेमकं तुम्ही शोधलं पाहिजे,जसं आपण आपल्याला आवङेल असाच जोङीदार शोधतो तसे आवङेल असेच काम शोधले पाहिजे. तुमचं काम तुमच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा असणारे, आणि समाधानी होण्याचा एकमेव मार्ग आहे असं काम करायचं जे तुम्हाला महान वाटतं. आणि महान काम करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जे करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्हाला जर ते अजून मिळालं नसेल तर शोधत राहा. शांत बसू नका.जसं मनाच्या सगळ्या बाबतीत होतं तसं, जेव्हा तुम्हाला ते मिळेल तुम्हाला ते कळेल.आणि, कुठल्याही सुंदर नात्याप्रमाणे, जशी वर्ष उलटतात तसं तसं ते आणखी सुंदर होत जातं.

No comments:

Post a Comment